AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | ‘भिकार सीरियल पाहणं बंद करा’ कंगनाच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गरजले!

Vikran Ghokhale on TV Serials : प्रसारमाध्यमं पैशांच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी म्हटलंय. आज कोणताही अर्थ नसलेल्या सीरीयल घाल पाणी- घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात आहेत, असंही म्हटलं.

Video | 'भिकार सीरियल पाहणं बंद करा' कंगनाच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले गरजले!
विक्रम गोखले, ज्येष्ठ अभिनेते (Photo Courtesy : Zee)
Reporter Amjad Khan
Reporter Amjad Khan | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 30, 2022 | 11:53 PM
Share

कल्याण : अभिनेत्री कंगनाच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केल्यानंतर चर्चेत आलेल्या विक्रम गोखले (Actor Vikram Gokhale) यांनी आता पुन्हा एक सनसनाटी विधान केलं आहे. टीव्हीवरील मालिकांबाबत (TV Serials) त्यांनी प्रेक्षकांना चांगलंच सुनावलं आहे. प्रेक्षकांनी भिकार सीरियल पाहणं बंद करावं, असं त्यांनी म्हटलंय. प्रेक्षकांशी ऑनलाईन संवाद साधताना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी हे विधान केलंय. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी विक्रम गोखले यांनी प्रसार माध्यमांच्या बदलत्या स्वरुपाबाबत चिंतादेखील व्यक्त केली. लोकांच्या चॉईसवरुन त्यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य करत या व्याख्यानमालेत प्रेक्षकांना तिखट शब्दांत सुनावलं आहे. याच व्याख्यानमालेत नागराज मंजुळेंचं (Actor & Director Nagraj Manjule) कौतुकही विक्रम गोखलेंनी केलं. यावेळी त्यांनी आपल्याला नागराजसोबत काम करायला आवडेल, असं देखील म्हटलंय.

नेमकं काय म्हणाले विक्रम गोखले?

ऑनलाईन व्याख्यानमालेत अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलंय की,…

प्रेक्षकांनी स्वताचा चॉईस तपासून पहा! निश्चित करा! त्याच्यावर बंधने घाला.. आणि भिकार सीरीयल पाहणे बंद करा.. तुमचा वेळ वाया घालवू नका! तुम्ही पाहत नाही म्हटल्यावर ते तयार करणार नाहीत आणि चांगल्याच्या मागे लागतील. म्हणजे मग चांगले दिग्दर्शक, नट लेखक येतील. म्हणूनच अंतर्मुख करणारा सिनेमा, नाटक, सीरीयल नक्की पहा.

राज्यभरातील प्रेक्षकांना प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी कल्याणामध्ये सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्राध्यापक रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत बोलताना भिकार सीरीयल न पाहण्याचं आव्हान केलंय. यावेळी बोलताना त्यांनी सुरुवातीपासूनच प्रसार माध्यमाच्या बदलत्या स्वरूपाबाबत चिंता व्यक्त केली. डीजीटायझेशनमुळे संवेदना, संवेदनशीलता या दोन गोष्टीतील अंतर वाढू लागले असून पैसे मिळविण्यासाठी काहीही प्रेक्षकाच्या माथी मारले जात आहे, असंही ते म्हणाले.

आज प्रसारमाध्यमं पैशांच्या मागे धावत असल्याने चांगल्याचा त्यांना विसर पडल्याचे गोखले यांनी म्हटलंय. आज कोणताही अर्थ नसलेल्या सीरीयल घाल पाणी- घाल पीठ या न्यायाने प्रेक्षकांच्या माथी मारल्या जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांनी, कोरोना काळाचे वर्णन करणारी शॉर्ट फिल्म दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तयार केली असल्याचं म्हणत त्याचं कौतुकही केलंय. नागराज यांच्या शॉर्ट फिल्ममधून अतिशय विदारक सत्य चित्रित करण्यात आलं असून अशी कलाकृती निर्माण केल्याबद्दल गोखले यांनी त्यांचे कौतुक केलंय. तसंच आपल्याला त्याच्याबरोबर काम करायला आवडेल असंही म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Video | तृतीयपंथी आईच्या मुलाचा डान्स पाहून भारावले, मिथुनसह परिणिती, करणचेही डोळे पाणावले!

महाराष्ट्राची हास्यजत्रामधील विनोदी कलाकार पृथ्विकला लुटण्याचा प्रयत्न, थोडक्यात निभावलं! नेमकं काय घडलं?

Hrithik Roshan | हृतिक रोशनसोबत हातात हात घालून जाणारी मिस्ट्री गर्ल कोण होती? उत्तर मिळालं!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली