AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरुंधती सिल्वासा, तर दीपा-कार्तिक गोव्यात, स्टार प्रवाहच्या मालिकांची चित्रिकरणं महाराष्ट्राबाहेर

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह वाहिनीकडून घेतली जाणार आहे. (Star Pravah Marathi Serial Shoot)

अरुंधती सिल्वासा, तर दीपा-कार्तिक गोव्यात, स्टार प्रवाहच्या मालिकांची चित्रिकरणं महाराष्ट्राबाहेर
मराठी मालिकांचं शूटिंग राज्याबाहेर होणार
| Updated on: Apr 21, 2021 | 3:33 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कठोर निर्बंध लादण्याच्या तयारीत आहे. राज्याची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या (Corona Lockdown) दिशेने होत आहे. अशात मनोरंजनाला ब्रेक लागू नये, यासाठी वाहिन्यांकडून खबरदारी घेतली जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) दैनंदिन मालिकांचं शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. (Star Pravah Marathi Serial Shoot relocated outside Maharashtra over Lockdown)

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून टॉपवर आहेत. बहुतांश आठवडे स्टार प्रवाहवरील वाहिन्याच पहिल्या पाचामध्ये स्थान मिळवत आहेत. आई कुठे काय करते, रंग माझा वेगळा, स्वाभिमान यासारख्या बहुतांश मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह वाहिनीकडून घेतली जाणार आहे.

व्यक्तिरेखांची नवी घरं आणि नवा परिसर?

‘आई कुठे काय करते!’, ‘स्वाभिमान’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’, ‘सांग तू आहेस का?’ या पाचही मालिकांचं शूटिंग आता गुजरात बॉर्डरवरील सिल्वासामध्ये होणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं शूट अहमदाबादेत होणार आहे. तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांची चित्रिकरणं गोव्याला हलवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता त्यांच्या लाडक्या व्यक्तिरेखांची नवी घरं आणि परिसर पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने कथानकातही काही बदल होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

कोणत्या मालिकेचं शूटिंग कुठे?

सुख म्हणजे नक्की काय असतं – गोवा

रंग माझा वेगळा – गोवा

आई कुठे काय करते – सिल्वासा

स्वाभिमान – सिल्वासा

(Star Pravah Marathi Serial Shoot)

सहकुटुंब सहपरिवार – सिल्वासा

मुलगी झाली हो – सिल्वासा

सांग तू आहेस का – सिल्वासा

फुलाला सुगंध मातीचा- अहमदाबाद

गेल्या वर्षीच्या अनुभवातून धडा

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिकांचं चित्रिकरण मार्च ते जुलै असे जवळपास चार महिने बंद होतं. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता. याचा पुन्हा फटका बसू नये, यासाठी दरम्यानच्या काळातच अनेक निर्मात्यांनी एपिसोड्सची बँक तयार करुन ठेवली होती. सध्या महाराष्ट्रातील चित्रिकरण थांबताच बहुतांश हिंदी मालिकांनी आपलं बस्तान राज्याबाहेर हलवलं आहे. मराठी मालिकांसाठी हा पर्याय खर्चिक असला, तरी अखंड मनोरंजनाची हमी देण्यासाठी अनेक वाहिन्यांनी पोटाला चिमटा काढत तो स्वीकारला आहे.

संबंधित बातम्या :

Star Pravah Parivaar | स्टार प्रवाह परिवारमध्ये अरुंधती, माऊ, जयदीप सर्वोत्तम; विजेत्यांची संपूर्ण यादी

बावधनच्या बगाड यात्रेतील 134 जण कोरोना पॉझिटिव्ह, साताऱ्यात मालिकांची शूटिंग बंद

(Star Pravah Marathi Serial Shoot relocated outside Maharashtra over Lockdown)

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.