AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येणार, ‘देवमाणूस 2’चा महाआरंभ होणार!

मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका हा 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Video | जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येणार, ‘देवमाणूस 2’चा महाआरंभ होणार!
Saru Aaji
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 3:16 PM
Share

मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus 2) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ‘देवमाणूस’मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.

मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका हा ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सरू आजी परतणार!

मालिकेतील जुनी पात्रे पुन्हा दिसणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. यातच आता सरू आजी मालिकेत परतणार असल्याचे कळते आहे. ‘तुझ्या तिरडीचा मोडला बांबू..’ म्हणत सरू आजीचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. पुन्हा एकदा आजीचा आवाज ऐकून सगळेच प्रेक्षक खूप खुश झाले आहेत.

पाहा प्रोमो :

सोशल मीडियावर चर्चा!

मालिकेचा दुसऱ्या भागाचा टिझर प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिला आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. हा नवीन सीजन लवकरचं सुरू होणार असून, यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहे.

शेवटच्या भागात काय घडलं?

‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या सिझनच्या अखेरच्या भागात डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग रुग्णालयात असल्याचं दाखवलं होतं. तर देवी सिंगच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या चंदाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. ऑगस्ट महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र अल्पावधीतच मालिकेचा दुसरा सिझन येत असून पुन्हा रात्री साडेदहा वाजताची वेळ प्रेक्षकांना राखून ठेवावी लागणार आहे.

लवकरच ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘देवमाणूस 2’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. 19 डिसेंबरला या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.