AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक चूक अन् दोन अधिकाऱ्यांंचा पत्ता कट; पंकजा मुंडेंच्या बैठकीनंतर नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग आणि सहसंचालक सतीश पडवळ यांना पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीला वारंवार अनुपस्थित राहिल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरून निलंबित करण्यात आले आहे.

एक चूक अन् दोन अधिकाऱ्यांंचा पत्ता कट; पंकजा मुंडेंच्या बैठकीनंतर नेमकं काय घडलं?
pankaja munde
| Updated on: Mar 01, 2026 | 7:51 AM
Share

महाराष्ट्र राज्य प्रशासनाच्या बैठकीत शुक्रवारी एक मोठी खळबळ उडाली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (MPCB) दोन अतिशय वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. एका भाजप मंत्र्याने बोलावलेल्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एका वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्याचा समावेश असल्याने संपूर्ण मंत्रालयीन आणि सनदी अधिकारी वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकं काय घडलं?

सध्या राज्यात महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या कामकाजादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषण पातळीवर चर्चा सुरु होती. या चर्चेत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सभागृहाला माहिती दिली की, चंद्रपूरमधील पर्यावरणविषयक गंभीर समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वारंवार बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, एमपीसीबीचे काही वरिष्ठ अधिकारी या बैठकांना सातत्याने अनुपस्थित राहिले.

याबद्दल मंत्र्यांनी मांडलेली ही बाब विधानसभा हंगामी अध्यक्ष दिलीप लांडे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतली. हा घोर निष्काळजीपणा आहे. तसेच लोकशाही प्रक्रियेचा अपमान आहे, असे दिलीप लांडे यांनी म्हटले. यानंतर त्यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत.

दोन अधिकारी निलंबित

या आदेशानुसार दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग (IAS) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक सतीश पडवळ यांचे निलंबन करण्यात आले आहे.

ही कारवाईचे आदेश देताना दिलीप लांडे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी बोलावलेल्या बैठकांकडे दुर्लक्ष करणे, हे केवळ पदाचा गैरवापर नसून जनतेप्रती असलेल्या कर्तव्याची पायमल्ली आहे. या अधिकाऱ्यांनी मंत्र्यांच्या सूचनांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे दिलीप लांडे यांनी म्हटले.

नोकरी करणाऱ्यांमध्ये नाराजी

एका आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याला बैठकीला अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून थेट निलंबित करणे ही अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. सहसा अशा प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली जाते. परंतु थेट निलंबनामुळे प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचा मान राखलाच पाहिजे असा कडक संदेश सरकारने दिला आहे. मात्र, या कारवाईमुळे नोकरी करणाऱ्यांमध्ये काही प्रमाणात नाराजी आणि अस्वस्थतेचे वातावरणही निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंग आणि सहसंचालक सतीश पडवळ यांना पर्यावरण मंत्र्यांच्या बैठकीला वारंवार अनुपस्थित राहिल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांच्या आदेशावरून निलंबित करण्यात आले आहे.

Follow Us
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा
सावंतवाडी-दोडामार्ग पट्ट्यातील 25 गावांना इको सेन्सिटिव्ह झोनचा दर्जा.
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य
इराणचे 6 देशांवर प्रतिहल्ले मध्यपूर्वेतील अमेरिकन तळांना केले लक्ष्य.
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?
अमेरिका-इराण युद्धातले 10 महत्त्वाचे मुद्दे कोणते?.
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार
अजितदादांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल आज संध्याकाळी येणार.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला; इस्रायलमध्ये आणीबाणी.
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला
इराणवर अमेरिका-इस्त्रायलचा मोठा हल्ला.
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका
मी अब्रू नुकसानीच्या दाव्याला भीक घालत नाही; अंबादास दानवेंची टीका.
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार
रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार.
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले
राऊतांचे आरोप बिनबुडाचे, फडणवीसांची माफी मागा! नवनाथ बन संतापले.
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला
केजरीवाल-सिसोदियांची निर्दोष मुक्तता होताच राऊतांचा सरकारवर हल्ला.