AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनयासोबतच गायनातही अव्वल आहेत मु्ख्यमंत्री विजय थलपती, 25 हून अधिक गाण्यांना दिला आवाज, शेवटचं गाणं तर…

अभिनयच नाही तर गायनात देखील मुख्यमंत्री विजय थलपती आहेत प्रचंड लोकप्रिय. आतापर्यंत 25 पेक्षा जास्त गाण्यांना दिला आहे आवाज. यामधील काही गाण्यांना मिळाले आहेत मोठं-मोठे अवॉर्ड.

अभिनयासोबतच गायनातही अव्वल आहेत मु्ख्यमंत्री विजय थलपती, 25 हून अधिक गाण्यांना दिला आवाज, शेवटचं गाणं तर...
Image Credit source: Social media
| Updated on: Jun 22, 2026 | 1:19 PM
Share

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि चाहत्यांचा प्रचंड आवडता असलेला अभिनेता म्हणजे थलपती विजय. थलपती विजय आज त्यांचा 52 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास निमित्ताने देशभरातील चाहते, चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विजय यांना प्रामुख्याने त्यांच्या दमदार अभिनयासाठी आणि अप्रतिम नृत्यशैलीसाठी ओळखले जाते. मात्र, ते एक उत्कृष्ट प्लेबॅक गायकही आहेत, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

अभिनयासोबतच संगीत क्षेत्रातही विजय यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज संगीतकार इलैयाराजा आणि ए. आर. रहमान यांच्यासोबतही गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील अनेक गाणी आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

गायन कारकिर्दीची सुरुवात

विजय यांनी त्यांच्या गायन कारकिर्दीची सुरुवात 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रसिकन’ या चित्रपटातील ‘Bombay City Sukka Rotti’ या गाण्याद्वारे केली होती. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी आतापर्यंत 25 हून अधिक लोकप्रिय गाण्यांना आवाज दिला आहे. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या Sachien या चित्रपटातील ‘Vaadi Vaadi’ हे गाणे त्यांच्या गायन कारकिर्दीतील 25 वे गाणे ठरले.

अभिनयासाठी घेतला ब्रेक

25 वे गाणे रेकॉर्ड केल्यानंतर विजय यांनी काही काळासाठी गायनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अभिनयावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी सिंगिंगमधून ब्रेक घेतला. मात्र, चाहत्यांना त्यांचा आवाज पुन्हा ऐकण्याची संधी काही वर्षांनी मिळाली.

‘गूगल गूगल’मधून दमदार पुनरागमन

2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थूपाकी’ या चित्रपटातील ‘Google Google’ या गाण्याद्वारे विजय यांनी गायन क्षेत्रात दमदार पुनरागमन केले. हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले आणि संगीतप्रेमींनी त्याचे भरभरून कौतुक केले.

या गाण्यासाठी त्यांना ‘विजय अवॉर्ड्स’मध्ये ‘फेव्हरेट साँग ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. तसेच SIIMA Awards मध्ये ‘बेस्ट प्लेबॅक सिंगर’ या पुरस्कारासाठी नामांकनही मिळाले. विजय यांच्या गायन कौशल्याची दखल प्रतिष्ठित Filmfare Awards South मध्येही घेण्यात आली. त्यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट प्लेबॅक गायकासाठी नामांकन मिळाले.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला