AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीत बनला स्टार, 11 दिवसांमध्ये साइन केले 47 चित्रपट, पण अचानक उद्धवस्त झालं करिअर, आता लग्नात गातो गाणी

90 च्या दशकात एका रात्रीत बनला स्टार. 11 दिवसांमध्ये केले 47 चित्रपट साइन. पण अचानक झालं करिअर उद्धवस्त. आता लग्नात गाणी गाऊन करतो कमाई.

एका रात्रीत बनला स्टार, 11 दिवसांमध्ये साइन केले 47 चित्रपट, पण अचानक उद्धवस्त झालं करिअर, आता लग्नात गातो गाणी
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 10, 2026 | 12:28 PM
Share

Bollywood Actor : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक असे कलाकार आहेत जे एका झटक्यात प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले पण तितक्याच वेगाने काळाच्या पडद्याआडही गेले. अशीच एक कथा आहे 90 च्या दशकातील अभिनेता राहुल रॉय यांची. निरागस चेहरा, स्टायलिश हेअरस्टाईल आणि रोमँटिक प्रतिमा यामुळे राहुल रॉय यांनी त्या काळात लाखो चाहत्यांच्या विशेषतः महिला प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.

9 फेब्रुवारी रोजी जन्मलेले राहुल रॉय यांनी ‘आशिकी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. विशेष म्हणजे, पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना केवळ 30 हजार रुपयांचं मानधन मिळालं होतं तर अभिनेत्री अनु अग्रवाल यांची फी राहुलपेक्षा जास्त होती. हा चित्रपट त्या काळात ब्लॉकबस्टर ठरला. सलग 6 महिने थिएटरमध्ये हाऊसफुल्ल चाललेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.

चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. त्या काळात राहुल रॉय यांची लोकप्रियता इतकी होती की शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्याही क्रेझपेक्षा राहुलची क्रेझ अधिक असल्याचं म्हटलं जात होतं.

एका चुकीने करिअर संपलं

मात्र म्हणतात ना, यश जितकं वेगाने मिळतं, तितकंच वेगाने नशिबही बदलू शकतं. आशिकीनंतर राहुल रॉय यांचं स्टारडम प्रचंड वाढलं. या यशाच्या भरात त्यांनी अवघ्या 11 दिवसांमध्ये तब्बल 47 चित्रपट साइन केले. घाईघाईत घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना मोठा फटका बसला. या चित्रपटांचं शूटिंग सुरू झालं पण त्यापैकी बहुतांश चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.

स्टायलिश लुकमुळे राहुल रॉय यांना ओळख मिळाली खरी पण त्यांच्या अभिनय क्षमतेवर हळूहळू प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. एकट्याच्या बळावर चित्रपट हिट करण्याची ताकद नसल्याची टीकाही होऊ लागली. दरम्यान, फ्लॉप चित्रपटांच्या मालिकेमुळे आणि ताणतणावामुळे राहुल रॉय यांना शारीरिक आजारांनीही घेरलं. परिणामी, ते हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर गेले. काही काळानंतर ते केवळ लहान-मोठ्या प्रोजेक्ट्समध्येच दिसू लागले.

ब्रेन स्ट्रोकने बदलले आयुष्य

सन 2020 मध्ये शूटिंगदरम्यान राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक आला. या घटनेनं त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. अनेक महिने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना नव्याने उभं राहण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. आर्थिक आणि शारीरिक अडचणींमधून मार्ग काढत त्यांनी आयुष्य पुढे नेलं.

आपलं नशीब पुन्हा आजमावण्यासाठी राहुल रॉय यांनी ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला. मात्र, आज ते प्रामुख्याने कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. चित्रपटांव्यतिरिक्त, ते लग्नसमारंभ आणि कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून गाणी गाताना दिसतात आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.