आमीर खानचा आदर्श घेत ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा सोशल मीडियाला ‘गुडबाय’!

बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमीर खान याने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. आता त्याच्या आदर्श घेत टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता रवी दुबेसुद्धा (Ravi Dubey) सोशल मीडियाला ‘गुडबाय’ म्हणण्याच्या तयारीत आहे.

आमीर खानचा आदर्श घेत ‘या’ प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याचा सोशल मीडियाला ‘गुडबाय’!
रवी दुबे
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 12:03 PM

मुंबई : सोशल मीडियाच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे कलाकार आपली प्रायव्हसी कमी होत आहे, असे म्हणत आहेत. तर, सोशल मीडियामुळे त्यांचा वेळही वाया जातो आहे. अशा स्थितीत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता आमीर खान याने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. आता त्याच्या आदर्श घेत टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता रवी दुबेसुद्धा (Ravi Dubey) सोशल मीडियाला ‘गुडबाय’ म्हणण्याच्या तयारीत आहे. रवीने आपले इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही काळासाठी तो सोशल मीडियावरून ब्रेक घेणार आहे (TV Actor Ravi Dubey decided to say goodbye to social media).

ही माहिती स्वतः रवीने सोशल मीडियावर पोस्ट करतच दिली आहे. ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, ‘मी पुढील काही दिवस इंस्टाग्राम डिलीट करत आहे.’ ही पोस्ट वाचताच चाहते आणि त्यांचे जवळचे मित्र चकित झाले आहेत. प्रसिद्ध टीव्ही कलाकाराने हा असा निर्णय का घेतला?, हे प्रत्येकास जाणून घ्यायचे आहे.

रवी दुबे यांची इन्स्टाग्राम पोस्ट :

पोस्टवर आल्या अशा प्रतिक्रिया

रवी दुबेसोबत जमाई राजा सीरियलमध्ये काम करणारी अभिनेत्री अचंत कौर यांनी अभिनेताला ‘का?’ असा प्रश्न केला आहे. अभिनेत्री अचिंतने या मालिकेत रवीच्या सासूची भूमिका साकारली होती. रवीच्या या कठोर निर्णयामुळे त्याच्या मित्रपरिवाराव्यतिरिक्त सर्व वापरकर्तेही आश्चर्यचकित आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘का? नाही रवी!’ त्याचवेळी दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, ‘आम्ही तुला खूप मिस करू’. त्याचप्रमाणे बर्‍याच चाहत्यांनी रडण्याचा इमोजी कमेंटमध्ये टाकून आपले दुःख व्यक्त केले आहे (TV Actor Ravi Dubey decided to say goodbye to social media).

कुटुंबाला वेळ द्यायचा आहे!

रवीच्या जवळचे सूत्रांचे म्हणणे आहे की, रवीने काही काळ इंस्टाग्रामवरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या व्यस्त वेळापत्रकांमुळे त्यांने सोशल मीडियाला ‘गुडबाय’ म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, त्याला पत्नी आणि कुटुंबासमवेत वेळ घालवायचा आहे. अशा परिस्थितीत तो सोशल मीडियावरून तात्पुरता ब्रेक घेणार आहे.

फोनवरून हटवेल अकाऊंट

रवी दुबे सोशल मीडियाला कायमचा ‘बाय’ करणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तो केवळ काही काळासाठी ब्रेक घेत आहे. तो इन्स्टाग्राम हटवू इच्छित असेल, तर ते केवळ त्याच्या फोनमधून डिलीट करेल. तो त्याचे संपूर्ण इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट करणार नाही. काही दिवसांच्या कालवधीनंतर तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर नक्की सक्रिय होईल.

(TV Actor Ravi Dubey decided to say goodbye to social media)

हेही वाचा :

66th Filmfare Awards Nominations List | ‘तान्हाजी’, ‘थप्पड’, ‘पंगा’चा डंका, पुरस्कारात सुशांतलाही स्थान, पाहा संपूर्ण यादी!

Kapil Sharma : ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी सज्ज, नव्या कलाकारांचीही एन्ट्री होणार!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.