AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“..तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं”, ऐश्वर्या राय असं का म्हणाली?

करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीला शोधणं खूप कठीण होतं. कारण आधीच आठ अभिनेत्रींनी करणला नकार दिला होता. अखेर राणीला ही भूमिका मिळाली होती.

..तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं, ऐश्वर्या राय असं का म्हणाली?
Aishwarya Rai
| Updated on: Nov 10, 2024 | 10:19 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आजवरच्या तिच्या करिअरमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. तिच्या करिअरमध्ये आणखी एका जबरदस्त भूमिकेचा समावेश झाला असता, मात्र त्या भूमिकेला तिने नकार दिला होता. मॉडेलिंगच्या दिवसांत जे केलं, तीच गोष्ट पुन्हा करत असल्याचा ठपका लागेल या भीतीने तिने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला नकार दिला होता. हे फार क्वचित लोकांना माहीत असेल की करणने त्याच्या ‘कुछ कुछ होता है’मधील भूमिकेसाठी सर्वांत आधी ऐश्वर्याला विचारलं होतं. नंतर ती भूमिका राणी मुखर्जीने साकारली. या चित्रपटासाठी करणने शाहरुख खान आणि काजोल यांना निश्चित केलं होतं. मात्र तिसऱ्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधणं त्याच्यासाठी खूप अवघड होतं.

“मी प्रत्येकाला त्या भूमिकेसाठी विचारलं होतं. मी त्या चित्रपटासाठी अक्षरश: भिकारी बनलो होतो. राणी मुखर्जीच्या भूमिकेसाठी आठ अभिनेत्रींनी आधीच नकार दिला होता. मला वाटलं होतं जर कोणीच होकार नाही दिला तर मलाच शॉर्ट स्कर्ट घालून ती भूमिका साकारावी लागेल. कथा ऐकल्यानंतर ऐश्वर्या रायशिवाय कोणीही मला परत फोन केला नाही”, असा खुलासा करणने एका कार्यक्रमात केला होता.

1999 मध्ये ‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्यानेही भूमिका नाकारण्याविषयीचा खुलासा केला होता. ती म्हणाली, “कुछ कुछ होता है या चित्रपटासाठी करणने मला विचारलं होतं. पण माझ्या तारखा आरके बॅनरअंतर्गत बनणाऱ्या चित्रपटासाठी ठरलेल्या होत्या. त्याहीपेक्षा कुछ कुछ होता है हा चित्रपट काजोलविषयी अधिक आहे. यात काहीच दुमत नाही आणि राणी मुखर्जीनेही खूप चांगलं काम केलंय. जर मी हा चित्रपट केला असता तर लोक म्हणाले असते, पहा ऐश्वर्याने तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांत जे केलं, तेच ती पुन्हा करतेय. तिचे केस एकदम सरळ आहेत, मिनी स्कर्ट्स घातलाय आणि कॅमेरासमोर अत्यंत ग्लॅमरस लूक दिसतोय. मला माहितीये, जर मी कुछ कुछ होता है हा चित्रपट केला असता तर लोकांनी मला ठेचून मारलं असतं.”

‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट आजही अनेकांच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी या तिघांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. तर सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर