AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Desai : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? जवळच्या मित्रांनी सांगितलं की..

चित्रपटसृष्टी आणि कला जगतात नावलौकिक असलेल्या नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या अशा जाण्याने जवळच्या मित्र आणि नातेवाईकांना धक्का बसला आहे.

Nitin Desai : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल का उचललं? जवळच्या मित्रांनी सांगितलं की..
Nitin Desai Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 02, 2023 | 2:25 PM
Share

मुंबई : नितीन चंद्रकांत देसाई…हे नाव समोर आलं की डोळ्यासमोर मोठमोठे सेट, ऐतिहासिक दाखले देणाऱ्या वास्तू उभ्या राहतात. नितीन देसाई यांनी आपल्या कतृत्वाने सिनेसृष्टीत नावलौकिक मिळवला होता. त्यांच्या अचानक अशा जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कर्जतच्या एन.डी. स्टुडिओत त्यांनी आपलं आयुष्याचा शेवट केला. त्यांच्या जाण्याची बातमी सर्वदूर् पसरल्यानंतर सिनेसृष्टी, सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नितीन देसाई यांनी अचानक इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पोलीस तपासात हळूहळू या बाबी उघड होतील. तत्पूर्वी त्यांच्या जवळच्या मित्रांकडून याबाबत काही माहिती समोर आली आहे.

जवळच्या मित्रांनी काय सांगितलं?

“नितीन देसाई गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत होते. त्यासाठी ते माझ्याकडे आले होते. कर्ज फेडण्यासाठी त्यांना आणखी कर्जाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. तसेच कोविड काळात स्टुडिओ बिझनेस कमी झाला होता आणि बरेचसे शूट्स मुंबईतच होत होते. त्यामुळे त्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं.”, असं फेडरेशन ऑफ वेस्टरन्न इंडिया सिने इम्प्लॉयीचे सदस्य बीएन तिवारी यांनी ई टाईम्ससोबत बोलताना सांगितलं.

नितीन देसाई यांच्या जवळचे आणि त्यांना चांगल्या प्रकारे ओळखणारे रंगराव चौगुले यांनीही त्यांच्याबाबत ई टाईम्सला माहिती दिली. “मी कालच त्यांच्य़ाशी बोललो होतो आणि त्यांनी सांगितलं की मी दिल्लीत असून मुंबईत परतणार आहे. पण आता त्यांनी असं का केलं ते माहिती नाही.”

नितीन देसाई यांच्या निधनानंतर आमदार महेश बालदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. “आम्ही महिन्याभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचललं असावं. नवीन चित्रपट शूटसाठी येणार आहे. पण एनडी स्टुडिओत टीव्ही शोचंच शूटिंग होत होतं. त्याने आर्थिक अडचण काही दूर झाली नाही.”, असं आमदार महेश बालदी यांनी सांगितलं.

नितीन देसाई यांनी काही वर्षांपूर्वी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. कर्जाची परतफेड करणं कठीण झालं होतं. यासाठी त्यांनी जमिन आणि मालमत्ता तारण ठेवली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मानसिक त्रासात होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...