AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडून गौरव मोरे हिंदीतल्या कॉमेडी शोमध्ये का गेला? सांगितलं खरं कारण

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून घराघरात पोहोचलेल्या गौरव मोरेनं मध्यंतरीच्या काळात हा शो सोडला होता. तेव्हा तो हिंदीतल्या कॉमेडी शोमध्ये काम करत होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौरवने यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून गौरव मोरे हिंदीतल्या कॉमेडी शोमध्ये का गेला? सांगितलं खरं कारण
Gaurav MoreImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 03, 2026 | 3:38 PM
Share

‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ म्हणून गौरव मोरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला. अफलातून विनोदबुद्धी आणि अचूक टायमिंगच्या जोरावर त्याने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली. या शोद्वारे प्रचंड लोकप्रियता आणि पैसा मिळत असतानाही त्याने मध्यंतरीच्या काळात यातून काढता पाय घेतला होता. हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव हिंदीतल्या ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोमध्ये झळकला होता. हास्यजत्रा सोडून हिंदीतला कॉमेडी शो करण्यामागचं नेमकं कारण त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘9 माईंड क्रिएशन’ला दिलेल्या मुलाखतीत गौरवने सांगितलं, “एकजण येतो आणि म्हणतो, तुमचा रोल मस्तय. तुम्ही येता.. मग कॉमेडी होते. ते विचारायचे की, सर तुम्ही या तारखेला आहात का? तुमच्यासाठी मस्त भूमिका आहे. त्यात हिरो-हिरोइन असतात, त्यांच्यामध्ये तुम्ही येता.. घरात समस्या निर्माण होतात.. तुम्ही येता आणि मग कॉमेडी होते. सतत तेच तेच करून मला कंटाळा आला. म्हणून मी वर्षभर या कामातून ब्रेक घेतला. त्यादरम्यान मी ‘मॅडनेस मचायेंगे’चे एपिसोड केले होते. कारण हिंदीतून मला बोलावलं होतं. बाकी मला हे करायचं नाही, असं काहीच नव्हतं.”

गौरवने ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘हास्य सम्राट’ यांसारख्या कॉमेडी शोमध्ये भाग घेतला होता. पण अभिनय आणि कॉमेडीत फारसा अनुभव नसल्याने पुढे जाऊ शकलं नसल्याचं त्याने म्हटलं. अनेकदा तो स्थानिक कार्यक्रमांमध्ये स्टँड-अप परफॉर्म करायचा. “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने मला सर्वकाही दिलं. पैसा, प्रसिद्धी आणि स्थैर्य या गोष्टी मला शोने दिल्या. सध्या मी सर्वांत महागड्या मोबाइल फोनपैकी एक वापरतो. दहा वर्षांपूर्वी माझ्याकडे बस किंवा ट्रेनने प्रवास करण्यासाठीही माझ्याकडे पैसे नव्हते. आता माझ्याकडे कार आणि बाईक आहे. त्यावेळी माझ्याकडे शूज नव्हते. पण आता शूजचं कलेक्शन आहे. माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे काही मित्रांनी माझ्याशी बोलणं बंद केलं होतं. पण आता तेच माझ्या घरी येतात आणि माझ्यासोबत सेल्फी किंवा फोटो क्लिक करतात,” अशा शब्दांत गौरव एका मुलाखतीत व्यक्त झाला होता.

Follow Us
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट...
मनोज जरांगे पाटलांना आंदोलनाआधीच मोठा धक्का; गृह विभागाने थेट... नेमकं काय घडलं?
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग...
अमरावतीत लहान लेकरं होरपळले अन् पालकमंत्री पाणीपुरी खातात मग... सुषमा अंधारे संतापल्या
थरकाप उडवणारे दृश्य! पूराच्या हाहाकारात 132 भारतीय पर्यंटकांचा मृत्यू
थरकाप उडवणारे दृश्य! नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; 132 भारतीय पर्यटकांचा दुर्दैवी अंत
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार-डी.के. शिवकुमार
कर्नाटकात वंदे मातरम् केवळ दोन कडवी गायली जाणार
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
राजकीय हालचालींना वेग! सुप्रिया सुळे पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार; कारण...
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर
मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी आयुक्तांना धारेवर धरलं
लाईव्ह लोकेशन सांगा मी आत्ताच... अंधारेंनी अमरावतीतील प्रकरणानंतर आयुक्तांनाच धारेवर धरलं
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणी 6 आरोपींना अटक
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
अमरावती रुग्णालय आग प्रकरण; चौकशी प्रमुखांवर सुषमा अंधारेंचा संताप
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...
लासलगाव कांदा एक्स्प्रेसला 28 तासांचा विलंब, 500 टन कांदा दिल्ली...