AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात गव्हाच्या पीठात मिक्स करा ‘ही’ गोष्ट, पोट राहील थंड

उन्हाळ्यात तुमच्या दैनंदिन आहारात छोटे बदल करून तुम्ही तुमच्या आरोग्याचे अनेक समस्यांपासून संरक्षण करू शकता. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशाच एका पदार्थाबद्दल सांगत आहोत जे गव्हाच्या पिठामध्ये मिसळल्यास शरीरात थंडावा येण्यासोबतच अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतील.

उन्हाळ्यात गव्हाच्या पीठात मिक्स करा 'ही' गोष्ट, पोट राहील थंड
wheat flourImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 08, 2025 | 6:36 PM
Share

उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवणे आणि पचनसंस्था निरोगी ठेवणे खूप महत्वाचे असते. कारण कडक सूर्यप्रकाश, वातावरणात उष्णतेच्या लाटा आणि वाढते तापमान, यामुळे आपले आरोग्य निरोगी राहावे यासाठी आपण उन्हाळ्यात थंड पदार्थांचा समावेश करत असतो. अशातच जर खाण्यात थोडासाही निष्काळजीपणा केला तर बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता आणि डिहायड्रेशन यासारख्या पोटाच्या समस्या त्रास देतात. अशा परिस्थितीत, शरीराला थंडावा देणाऱ्या आणि पचन सुधारणाऱ्या गोष्टी तुमच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.

भारतीय घरांमध्ये गव्हाच्या पिठाच्या पोळी शिवाय जेवण पूर्ण होत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की जर तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये एक गोष्ट मिक्स केली तर ती तुमचे शरीर थंड ठेवतेच पण तुम्हाला अनेक फायदे देखील देते. आज या लेखात आपण जाणून घेऊयात की शरीर थंड ठेवण्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये कोणती गोष्ट मिक्स करावी.

गव्हाच्या पिठामध्ये बार्ली म्हणजेच जव मिक्स करावे. कारण बार्ली हे असेच एक धान्य आहे जे उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि पोट थंड ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. जर तुम्ही तुमच्या आहारात थोडे बदल केले तर तुम्ही कोणत्याही औषधाशिवाय अनेक समस्या टाळू शकता. तुमच्या नेहमीच्या गव्हाच्या पिठामध्ये बार्लीचे पीठ मिक्स करा आणि पोळी बनवा आणि तुम्हाला त्याचे आश्चर्यकारक फायदे स्वतः जाणवतील.

गव्हाच्या पिठामध्ये बार्लीचे पीठ का मिक्स करावे?

बार्लीची चव थोडी गोड असते आणि त्यात थंडावा असतो. जेव्हा ते गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून पोळी बनवली जाते. तेव्हा ते केवळ चव वाढवतेच असे नाही तर आरोग्यासाठी वरदान देखील ठरते. विशेषतः उन्हाळ्यात त्याचे सेवन शरीराला थंड ठेवते आणि पचनसंस्था सुधारते.

गव्हाच्या पीठात बार्ली मिक्स करून खाण्याचे फायदे

1. पोट थंड करते- बार्लीमध्ये थंडावा असतो, जो उन्हाळ्यात खाल्ल्यास शरीराचे तापमान संतुलित करण्यास मदत करतो. याच्या सेवनाने तुम्हाला उष्माघातापासून संरक्षण करते आणि निर्जलीकरणाचा धोका कमी करते.

2. बद्धकोष्ठतेपासून आराम – बार्लीमध्ये भरपूर फायबर असते, जे आतडे साफ करण्यास मदत करते. ज्यांना वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या सतावत असते त्यांच्यासाठी हे एक रामबाण उपाय आहे.

3. पोट फुगणे आणि गॅसची समस्या दूर करते- बार्लीचे सेवन पोटात गॅस तयार होण्यास प्रतिबंध करते आणि भूक देखील नियंत्रित करते. हे नैसर्गिक डिटॉक्ससारखे काम करते. त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन खूप फायदेशीर आहे.

4. वजन कमी करण्यास उपयुक्त – फायबर भरपूर असल्याने यांच्या सेवनाने पोट बराच काळ भरलेले राहते. यांमुळे जास्त खाण्याच्या सवयीवर नियंत्रण राहते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

5. साखरेची पातळी नियंत्रित करते- बार्लीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रित राहण्यास मदत होते, त्यामुळे मधुमेहाचे रुग्णही त्यापासून बनवलेली रोटी सहज खाऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.