AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अँटी-बायोटिक्सच्या अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका, या गोष्टी ठेवा लक्षात

जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 7 लाख लोक एएमआरमुळे (Antimicrobial resistance ) जीव गमावतात आणि 2050 सालापर्यंत हा आकडा 1 कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

अँटी-बायोटिक्सच्या अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका, या गोष्टी ठेवा लक्षात
अँटी-बायोटिक्सच्या अतिसेवनामुळे मृत्यूचा धोका, या गोष्टी ठेवा लक्षातImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2022 | 3:12 PM
Share

नवी दिल्ली: अँटी-बायोटिक औषधांचे युग सुरू होण्यापूर्वी, संसर्गजन्य जीवाणूंमुळे रोग आणि साथीच्या रोगांची महामारी (Epidemics and Pandemics) यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. रोगांवर उपचार (treatment) करण्यासाठी अँटी-बायोटिक्सची सुरूवात ही 20 व्या शतकातील वैद्यकीय शास्त्रातील सर्वात मोठी प्रगती होती. लोकांना इजा न करता शरीरातील बॅक्टेरिया (bacteria) नष्ट करण्यास ही औषधे सक्षम आहेत.

त्यानंतर पुढच्या तीन दशकांत वैद्यकीय क्षेत्रात खूप विकास झाला आणि सूक्ष्म असलेल्या बॅक्टेरिआचा सामना करण्यासाठी अनेक शोध लागले. मात्र त्यानंतर मोठी घसरण झाली आणि शेवटी शोध घेऊनही काही निष्पन्न झाले नाही. पण शोध लागल्यापासून या अँटी-बायोटिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. अँटी-बायोटिक औषधांचा अतिवापर आणि दुरूपयोग यामुळे विशेषत: बॅक्टेरिआंमध्ये Antimicrobial resistance (AMR) म्हणजेच अँटी-बायोटिक्सना प्रतिकार करण्याची क्षमता झपाट्याने वाढत आहे.

अँटी-बायोटिक्समुळे होते मोठे नुकसान

व्हायरस ज्या प्रकारे पसरतो आणि विभागला जातो, अशा परिस्थितीत, म्यूटेशन होत असते. त्यापैकी बहुतेक वेळेस म्यूटेशन दरम्यान व्हायरसमध्ये फारसा बदल होत नाही. मात्र अँटी-बायोटिक्सचा जास्त वापरामुळे असे म्यूटेशन होते.

ज्यामुळे औषधांचा परिणाम होत नाही आणि रुग्णाचा आजार, त्रास बरा होत नाही. यामुळे केवळ मृत्यूदरच वाढत नाही तर जास्त पॉवर असलेले अँटी-बायोटिकसह रुग्णालयात राहण्याचा कालावधी व खर्च दोन्ही वाढतो.

जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे 7 लाख लोक एएमआरमुळे (Antimicrobial resistance ) आपला जीव गमावतात आणि 2050 सालापर्यंत हा आकडा 1 कोटी पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. केवळ एएमआरमुळे जीव गमावलेल्या लोकांची संख्या कॅन्सर आणि रस्ते अपघातात जीव गमावलेल्या लोकांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहे. भारतातही अशीच परिस्थिती आहे.

चुकीच्या अँटी-बायोटिक्सचे सेवन करू नका

व्हायर इन्फेक्शन झाल्यावर बहुसंख्य लोकांनी अँटी-बायोटिक औषधांचे सेवन केले आहे. अँटी-बायोटिक्सचा परिणाम बॅक्टेरिआवर होतो, पण व्हायरसवर नव्हे हे कोणाच्याही लक्षात येतत नाही किंवा मग लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. भारतात केमिस्टच्या सल्ल्यानुसार, औषधे विकत घेणे ही सामान्य गोष्ट आहे.

चुकीच्या अँटी-बायोटिक्सची निवड करणे, चुकीचे अन्न सेवन करणे आणि (आजारातून) बरे झाल्यानंतरही उपचार घेत राहणे, हे आपल्या देशात सुपरबग्स वाढण्याचे सर्वात मोठे कारण आहे. या प्रकरणांमध्ये डॉक्टरही मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत, हे दुर्दैवी आहे.

कल्चर रिपोर्ट न पाहता ते अँटी-बायोटिक्सचा वापर करत आहेत. काही प्ररिस्थितीमध्ये रुग्णाची स्थिती समजून न घेता औषधांचा डोस वाढवला जातो आणि काही ठिकाणी तर हलकासा संसर्ग असला तरी अँटी-बायोटिक्स दिली जातात.

अँटी-बायोटिक प्रतिकारापासून संरक्षण करण्यासाठी काय करू शकतो

1) अँटी-बायोटिक्सची खरोखर गरज आहे का ते सर्वप्रथम चेक करा. खरंतर ताप आणि सर्दी-खोकल्याची 90 टक्के प्रकरणे हे व्हायरलमुळे होतात, जे आपोआप बरे होतात.

2) अँटी-बायोटिक्सचा डोस योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. त्याशिवाय डॉक्टरांनी सांगितलेला औषधांचा कोर्स पूर्ण करावा.

3) शक्य असल्यास कल्चर आणि औषधांची सेन्सिटिव्हिटी टेस्ट करण्यावर भर द्या.

4) हातांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक