AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss Tips: वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळी ‘हे’ पदार्थ टाळा

वजन कमी करायचे असेल तर व्यायामासोबतच पौष्टिक पण संतुलित आहार घेणेही तितकेच महत्वाचे आहे.

Weight Loss Tips: वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळी 'हे' पदार्थ टाळा
वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळी 'हे' पदार्थ टाळा Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 17, 2022 | 12:29 PM
Share

नवी दिल्ली: वजन कमी करणे (weight loss) हे काही फार सोपं काम नाही. त्यासाठी मेहनत आवश्यक आहे. वजन कमी करायचे असेल तर व्यायाम (exercise)करण्यासोबतच पौष्टिक पण संतुलित आहार (proper diet) घेणेही तितकेच महत्वाचे आहे. अशा वेळी काही पदार्थांचे सेवन करणे, मुख्यत: संध्याकाळच्या वेळी असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. ते पदार्थ खाल्यास वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. ते पदार्थ कोणते हे जाणून घेऊया.

हाय कॅलरी फूड

संध्याकाळच्या वेळेसे हाय कॅलरी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. त्यांचे सेवन केल्यास ते पदार्थ पचन तंत्र कमकुवत करण्याचे काम करतात. हाय कॅलरी असलेल्या पदार्थांऐवजी अशा पदार्थांचे सेवन करावे, ज्यामध्ये कॅलरीज कमी असतात.

फ्रोजन पदार्थ

फ्रोजन (गोठवलेले पदार्थ) पदार्थांमध्ये मीठ आणि साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. तसेच त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाणही खूप अधिक असते. अशा पदार्थांचे संध्याकाळी सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते.

साखरयुक्त पेय

तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर संध्याकाळच्या वेळेस साखरयुक्त पेयांचे सेवन करणे टाळावे. त्यामध्ये कॅलरीज खूप प्रमाणात असतात. ह्या अशा पेयांचे सेवन केल्यास वजन जलदरित्या वाढू शकते. तसेच लसाखरयुक्त पेय प्यायल्यास ब्लोटिंगच्या समस्येचाही सामना करावा लागू शकतो.

चीज

चीज हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. मात्र जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळच्या वेळेस चीज बिलकुल खाऊ नये. त्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्स असतात. तसेच त्यामध्ये सोडिअमही असते. जे बॅड कोलेस्ट्रॉल वाढवते. संध्याकाळी चीजचे सेवन केल्याने वजन वेगाने वाढते.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.