AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : वेलचीचे पाणी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!

आजच्या काळात उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनत आहे. वाढत्या तणावामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. जर तुम्ही नियमितपणे वेलचीचे पाणी प्यायले तर तुमची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होते आणि हृदयरोग टाळता येतो.

Health Care : वेलचीचे पाणी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
वेलची
| Edited By: | Updated on: Sep 17, 2021 | 8:16 AM
Share

मुंबई : वेलचीचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. त्यात अनेक औषधी गुणधर्म आढळतात, जे आपल्याला अनेक रोगांपासून वाचवतात. वेलचीचे दोन प्रकार आहेत. वेलचीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि सी, लोह, मॅग्नेशियम, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, फायबर, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम इत्यादी अनेक पोषक तत्त्वे आढळतात. (Cardamom water is beneficial for health)

हाय बीपी

आजच्या काळात उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनत आहे. वाढत्या तणावामुळे उच्च रक्तदाबाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. जर तुम्ही नियमितपणे वेलचीचे पाणी प्यायले तर तुमची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित होते आणि हृदयरोग टाळता येतो.

कोलेस्टेरॉल कमी करते

चुकीच्या आहारामुळे शरीरात खराब कोलेस्टेरॉल जमा होऊ लागते. वेलची शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यासाठी उपयुक्त मानली जाते. तसेच, ते शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोका कमी करते.

कर्करोगापासून संरक्षण

काही संशोधनात असे सुचवले आहे की, वेलचीच्या पाण्यात असलेले पोषक आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म एखाद्या व्यक्तीला कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचवण्याचे काम करतात. पण हे पाणी नियमित प्यावे लागते.

श्वसनाच्या समस्येसाठी

श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी वेलचीचे पाणी खूप चांगले मानले जाते. त्यात असलेले अँटी-ऑक्सिडंट, अँटी-मायक्रोबियल आणि एंटी-इंफ्लेमेटरी पोषक अनेक प्रकारच्या इन्फेक्शनपासून संरक्षण करतात. दम्याच्या रुग्णांसाठीही वेलचीचे पाणी खूप प्रभावी आहे.

पाचक प्रणाली सुधारते  वेलचीचे पाणी प्यायले तर पचनक्रिया चांगली होते. गॅसची समस्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित केली जाते. दुसरीकडे, वेलचीचे सेवन केल्याने दातांच्या पोकळीची समस्या दूर होते.

वेलचीचे पाणी कसे बनवायचे

पाच वेलची सोलून आणि ठेचून एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजवा. हे पाणी सकाळी उकळा. नंतर ते कोमट असताना प्या. हे पाणी दिवसातून किमान दोन ते तीन वेळा प्यायल्याने त्याचे पूर्ण फायदे मिळतात. तसेच आपण दररोज जेवन केल्यानंतरही हे पाणी पिऊ शकता.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Cardamom water is beneficial for health)

Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.