AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपाशी पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

भारतात अनेकांना चहा पिण्याची सवय आहे. सकाळी उठल्यानंतर चहाचा कप हाती लागतो. मात्र यामुळे काय नुकसान होऊ शकतं याची कल्पना देखील नाही. उपाशी पोटी चहा प्यायल्याने काय होतं ते तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

उपाशी पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
उपाशी पोटी चहा प्यायल्याने अ‍ॅसिडिटी वाढते का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतातImage Credit source: GettyImages
| Updated on: Jul 10, 2025 | 6:20 PM
Share

भारतीय आणि चहाचं रोजचं नातं आहे. चहाशिवाय अनेकांची दिवसाची सुरुवात होत नाही. सकाळी उठल्यावर चहाचे दोन घोट घेतल्यानंतर फ्रेश वाटतं. त्यामुळे अनेक जण सकाळी उठल्याबरोबर चहाचा कप तोंडाला लावतात. पण उपाशी पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो माहिती आहे का? यामुळे पोटात आम्लता वाढते. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला चहा पिण्याची सवय असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जर या नियमांचं पालन केलं तर नक्कीच आरोग्याचं नुकसान होणार नाही. एम्स दिल्लीत गॅस्ट्रोलॉजी विभागाच्या माजी डॉ. अनन्य गुप्ता यांच्या मते, जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तेव्हा तुमचा पोट रिकामी असतं. यामुळे पोटात गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच अॅसिड अधिच सक्रिय असते. अशा वेळी तुम्ही जर चहा (दूध असलेला चहा) घेता तेव्हा अॅसिड वाढतं. त्यामुळे अॅसिडिटी, पोटात जळजळ, गॅस आणि ब्लोटिंगसारखी समस्या होते.

चहामध्ये कॅफीन आणि टॅनिन असते. त्यामुळे पचन प्रक्रिया खराब होऊ शकते. टॅनिनमुळे पचनप्रक्रिया मंद होते आणि भूक मरते. यामुळे उपाशी पोटी चहा घेतल्याने नैसर्गिक प्रक्रियेला नुकसान होऊ शकतं. यामुळे गॅस्ट्रिक समस्या वाढण्याची शक्यता असते. सकाळी चहा प्यायल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. तसेच आंबट ढेकर आणि गळ्यात जळजळ होते. भूक लागत नाही आणि जेवायची इच्छा राहात नाही. दुपारपर्यंत पोटात गॅस आणि ब्लोटिंग राहते. जर अशी लक्षणं वारंवार दिसत असतील तर सकाळचा चहा तुमच्यासाठी चांगला नाही.

पोषण तज्ज्ञांच्या मते, “जर सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय बराच काळ राहिली तर त्यामुळे पोटातील तीव्र आम्लता आणि जठराची सूज यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.”अ‍ॅसिडिटीपासून वाचण्यासाठी चहा पिण्यापूर्वी काहीतरी खा. भिजलेले बदाम, केळं किंवा सुखा टोस्ट खा. चहासाठी पर्याय शोधा. हर्बल किंवा ग्रीन टी प्या. यामध्ये कॅफीनचं प्रमाण कमी असतं. सकाळी कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पोट शांत करतं. जर चहा प्यायचाच झाला तर नाश्ता करताना किंवा केल्यानंतर प्या.

Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा