AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज सकाळी एक कप धन्याचे पाणी प्या; ‘या’ आजारांपासून दूर रहा

जवळपास सर्वच भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा (Coriander) वापर केला जातो. धने हे भारतामधील लोकप्रीय मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक आहे. धन्यामुळे केवळ पदार्थच स्वादिष्ट बनत नाहीत. तर धन्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळेच तर आहार तज्ज्ञांकडून धन्याचे (Coriander Water) पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

रोज सकाळी एक कप धन्याचे पाणी प्या; 'या' आजारांपासून दूर रहा
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 7:09 PM
Share

जवळपास सर्वच भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा (Coriander) वापर केला जातो. धने हे भारतामधील लोकप्रीय मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक आहे. धन्यामुळे केवळ पदार्थच स्वादिष्ट बनत नाहीत. तर धन्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. त्यामुळेच तर आहार तज्ज्ञांकडून धन्याचे (Coriander Water) पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. धन्याचे पाणी बनवण्यासाठी रात्री एक कप पाण्यामध्ये एक चमचा धने भिजत घाला. सकाळी या पाण्याला गाळून घ्या. त्यानंतर तुम्ही हे पाणी पेऊ शकता. धन्यांच्या पाण्यामध्ये (Benefits Of Dhaniya Water) मोठ्याप्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियमचा साठा असतो. तसेच धन्यामधील इतर पोषक तत्वे देखील तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवता. म्हणूनच अनेक भारतीय पदार्थांमध्ये धन्याचा वापर केला जातो. आज आपन धन्याचे विविध उपयोग जाणून घेणार आहोत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी

धन्याच्या पाण्यामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅगन्शियमचा साठा असतो. हे पोषक तत्वे तुम्हाला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात. धन्याचे पाणी रोज सकाळी पिणे आरोग्यदायी असते. धन्याचे पाणी पिल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच धन्याचे पाणी पिल्यास तुमचे शरीर देखील तंरुस्त राहाते.

वजन कमी होते

धन्याच्या पाण्यामध्ये असे देखील काही औषधी गुणधर्म असतात, ज्यामुळे तुमची पचन शक्ती वाढते. सोबतच तुमच्या शरीरातील मेटाबॉल्जिम देखील वाढते. यामुळे तुमचे वजन अवघ्या काही दिवसांत कमी होऊ शकते.

तोंड येण्याच्या समस्येवर गुणकारी

तुमच्या शरीरात अधिक उष्णता असेल, आणि त्यामुळे जर तुम्हाला सातत्याने तोंडात फोड येत असतील, तर त्यावर देखील धने रामबाण इलाज आहे. धन्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास तुमच्या शरीरामधील उष्णता कमी होते. परिणामी उष्णतेपासून निर्माण होणाऱ्या समस्येतून तुम्हाला सुटका मिळते.

कॉलेस्ट्रोलपासून सुटका

विविध पदार्थ्यांच्या सेवनामुळे शरीरात कॉलेस्ट्रोल वाढू शकते. कॉलेस्ट्रोलमुळे तुम्हाला विविध आजार होऊ शकतात. तुम्ही रोज रात्री धने भिजत घालून, सकाळी ते पाणी पिल्यास तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रोलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.

टीप : वरील सर्व माहिती ही सामान्य ज्ञानाच्या हेतून लिहिण्यात आली आहे. तुम्ही तुमचा डायट प्लॅन ठरवताना तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.

संबंधित बातम्या

ही दुखणं सांगतात तुम्हाला थंडी बाधली…त्यामुळे घ्या काळजी कारण मुंबईत अचानक थंडी वाढली…

Covid-19: बापरे! संसद भवनातील 875 कर्मचारी पॉझिटीव्ह; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना कोरोनाची लागण

देश कोरोनामुक्त केला, आता ओमिक्रॉनला घाबरून स्वत:चाच विवाह सोहळा रद्द; न्यूझीलंडच्या पंतप्रधान Jacinda Ardern यांचा मोठा निर्णय

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली