AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात सर्दी खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. सर्दी आणि खोकल्यामुळे रात्री झोप लागणे ही शक्य होत नाही. हा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते आले आणि दालचिनीचे काढा पिल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी
ginger Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 22, 2024 | 10:13 PM
Share

हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. दालचिनी आणि आल्यापासून बनवलेला काढा हा असाच एक नैसर्गिक उपाय आहे. जो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर खोकला, सर्दी आणि ताप यापासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतो. पाहूया काढा बनवण्याची रेसिपी.

साहित्य :

दोन कप पाणी

एक इंच किसलेले आले

एक दालचिनीची काडी

काळी मिरी चार ते पाच

एक टीस्पून मध

लिंबाचा रस चवीनुसार

कृती :

सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळवून घ्या.

त्यानंतर उकळत्या पाण्यात किसलेले आले, दालचिनीची काडी आणि काळी मिरी घाला.

नंतर मंद आचेवर पाच ते सात मिनिटे उकळू द्या.

यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. काढा कोमट झाल्यास त्यात मध आणि लिंबाचा रस घाला.

या काढ्याचे सेवन तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.

काढा पिण्याचे फायदे:

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आले आणि दालचिनी या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आले आणि दालचिनीचा काढा नियमितपणे पिल्यास संसर्ग आणि रोगांपासून संरक्षण होते. यामुळे कफासह खोकला वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे श्वसनाच्या संसर्गापासूनही आराम मिळतो.

कफासाठी फायदेशीर

जेव्हा तुम्हाला कफ आणि खोकला येतो तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम श्वसन प्रणालीमध्ये संसर्ग होतो. आले आणि दालचिनीचा काढा कफ दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. श्लेशमा दूर करण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी हा काढा फायदेशीर आहे. यामुळे वायू मार्ग साफ होतो आणि कफ दूर होतो.

दाहक विरोधी गुणधर्म

पाण्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. आल्याबरोबर दालचिनी घेतल्यास श्वसन मार्गातील जळजळ कमी होण्यास मदत होते. यामुळे कफ कमी होण्यास मदत होते आणि श्वास घेण्याचा त्रास होत नाही.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल