AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात सर्दी खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. सर्दी आणि खोकल्यामुळे रात्री झोप लागणे ही शक्य होत नाही. हा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते आले आणि दालचिनीचे काढा पिल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी
ginger Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 22, 2024 | 10:13 PM
Share

हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. दालचिनी आणि आल्यापासून बनवलेला काढा हा असाच एक नैसर्गिक उपाय आहे. जो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर खोकला, सर्दी आणि ताप यापासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतो. पाहूया काढा बनवण्याची रेसिपी.

साहित्य :

दोन कप पाणी

एक इंच किसलेले आले

एक दालचिनीची काडी

काळी मिरी चार ते पाच

एक टीस्पून मध

लिंबाचा रस चवीनुसार

कृती :

सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळवून घ्या.

त्यानंतर उकळत्या पाण्यात किसलेले आले, दालचिनीची काडी आणि काळी मिरी घाला.

नंतर मंद आचेवर पाच ते सात मिनिटे उकळू द्या.

यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. काढा कोमट झाल्यास त्यात मध आणि लिंबाचा रस घाला.

या काढ्याचे सेवन तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.

काढा पिण्याचे फायदे:

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आले आणि दालचिनी या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आले आणि दालचिनीचा काढा नियमितपणे पिल्यास संसर्ग आणि रोगांपासून संरक्षण होते. यामुळे कफासह खोकला वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे श्वसनाच्या संसर्गापासूनही आराम मिळतो.

कफासाठी फायदेशीर

जेव्हा तुम्हाला कफ आणि खोकला येतो तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम श्वसन प्रणालीमध्ये संसर्ग होतो. आले आणि दालचिनीचा काढा कफ दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. श्लेशमा दूर करण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी हा काढा फायदेशीर आहे. यामुळे वायू मार्ग साफ होतो आणि कफ दूर होतो.

दाहक विरोधी गुणधर्म

पाण्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. आल्याबरोबर दालचिनी घेतल्यास श्वसन मार्गातील जळजळ कमी होण्यास मदत होते. यामुळे कफ कमी होण्यास मदत होते आणि श्वास घेण्याचा त्रास होत नाही.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.