AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात सर्दी खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. सर्दी आणि खोकल्यामुळे रात्री झोप लागणे ही शक्य होत नाही. हा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते आले आणि दालचिनीचे काढा पिल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी
ginger Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 22, 2024 | 10:13 PM
Share

हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. दालचिनी आणि आल्यापासून बनवलेला काढा हा असाच एक नैसर्गिक उपाय आहे. जो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर खोकला, सर्दी आणि ताप यापासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतो. पाहूया काढा बनवण्याची रेसिपी.

साहित्य :

दोन कप पाणी

एक इंच किसलेले आले

एक दालचिनीची काडी

काळी मिरी चार ते पाच

एक टीस्पून मध

लिंबाचा रस चवीनुसार

कृती :

सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळवून घ्या.

त्यानंतर उकळत्या पाण्यात किसलेले आले, दालचिनीची काडी आणि काळी मिरी घाला.

नंतर मंद आचेवर पाच ते सात मिनिटे उकळू द्या.

यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. काढा कोमट झाल्यास त्यात मध आणि लिंबाचा रस घाला.

या काढ्याचे सेवन तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.

काढा पिण्याचे फायदे:

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आले आणि दालचिनी या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आले आणि दालचिनीचा काढा नियमितपणे पिल्यास संसर्ग आणि रोगांपासून संरक्षण होते. यामुळे कफासह खोकला वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे श्वसनाच्या संसर्गापासूनही आराम मिळतो.

कफासाठी फायदेशीर

जेव्हा तुम्हाला कफ आणि खोकला येतो तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम श्वसन प्रणालीमध्ये संसर्ग होतो. आले आणि दालचिनीचा काढा कफ दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. श्लेशमा दूर करण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी हा काढा फायदेशीर आहे. यामुळे वायू मार्ग साफ होतो आणि कफ दूर होतो.

दाहक विरोधी गुणधर्म

पाण्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. आल्याबरोबर दालचिनी घेतल्यास श्वसन मार्गातील जळजळ कमी होण्यास मदत होते. यामुळे कफ कमी होण्यास मदत होते आणि श्वास घेण्याचा त्रास होत नाही.

Follow Us
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
PM Modi–Amit Shah Meeting | मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
Chhatrapati Sambhajinagar | जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर समर्थकाचं आंदोलन
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
Shivsena | शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात, आज...
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर आरोप
कुणबी प्रमाणपत्रावरून जरांगे पाटील आक्रमक; फडणवीस-बावनकुळेंवर गंभीर आरोप