AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी

हिवाळ्यात सर्दी खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. सर्दी आणि खोकल्यामुळे रात्री झोप लागणे ही शक्य होत नाही. हा त्रास दूर करण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. तज्ञांच्या मते आले आणि दालचिनीचे काढा पिल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

हिवाळ्यात आले आणि दालचिनीचा काढा प्यायल्यास काय होईल?, जाणून घ्या रेसिपी
ginger Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 22, 2024 | 10:13 PM
Share

हिवाळ्यात आपली रोगप्रतिकारक शक्ती खूपच कमकुवत होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या आहारात अशा खाद्यपदार्थांचा समावेश केला पाहिजे ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल. दालचिनी आणि आल्यापासून बनवलेला काढा हा असाच एक नैसर्गिक उपाय आहे. जो केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवत नाही तर खोकला, सर्दी आणि ताप यापासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करतो. पाहूया काढा बनवण्याची रेसिपी.

साहित्य :

दोन कप पाणी

एक इंच किसलेले आले

एक दालचिनीची काडी

काळी मिरी चार ते पाच

एक टीस्पून मध

लिंबाचा रस चवीनुसार

कृती :

सर्वप्रथम एका पॅनमध्ये पाणी उकळवून घ्या.

त्यानंतर उकळत्या पाण्यात किसलेले आले, दालचिनीची काडी आणि काळी मिरी घाला.

नंतर मंद आचेवर पाच ते सात मिनिटे उकळू द्या.

यानंतर गॅस बंद करून काढा गाळून घ्या. काढा कोमट झाल्यास त्यात मध आणि लिंबाचा रस घाला.

या काढ्याचे सेवन तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता.

काढा पिण्याचे फायदे:

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

आले आणि दालचिनी या दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आले आणि दालचिनीचा काढा नियमितपणे पिल्यास संसर्ग आणि रोगांपासून संरक्षण होते. यामुळे कफासह खोकला वाढण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे श्वसनाच्या संसर्गापासूनही आराम मिळतो.

कफासाठी फायदेशीर

जेव्हा तुम्हाला कफ आणि खोकला येतो तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम श्वसन प्रणालीमध्ये संसर्ग होतो. आले आणि दालचिनीचा काढा कफ दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. श्लेशमा दूर करण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी हा काढा फायदेशीर आहे. यामुळे वायू मार्ग साफ होतो आणि कफ दूर होतो.

दाहक विरोधी गुणधर्म

पाण्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात. आल्याबरोबर दालचिनी घेतल्यास श्वसन मार्गातील जळजळ कमी होण्यास मदत होते. यामुळे कफ कमी होण्यास मदत होते आणि श्वास घेण्याचा त्रास होत नाही.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.