AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाईत जेवण करणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत

आपल्या जेवणाच्या वेगावरून आपल्या आरोग्याविषयी सर्व काही ठरवले जाते. जर तुम्ही घाई मध्ये जेवण करत असाल तर तुमची ही वाईट सवय ताबडतोब सोडून द्या. कारण यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. घाईत जेवण करणे म्हणजे एक प्रकारे आजारांना आमंत्रण देणे आहे.

घाईत जेवण करणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारक, जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचे मत
घाईत जेवण करणे आरोग्यासाठी ठरू शकते हानिकारकImage Credit source: Instagram
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 30, 2025 | 3:16 PM
Share

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत आपण स्वतःकडे कमी लक्ष देतो. अनेक लोकांना तर कमी वेळेत शक्य तितके जास्त काम करायचे असते. त्यामुळे आपण आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष देत नाही. वेळ वाचवण्यासाठी अनेक वेळा आपण जेवण पटकन घाई मध्ये करतो. पण तुम्हाला माहिती आहे का की घाईत कधीही जेवण करू नये. जर तुम्ही देखील घाई मध्ये जेवण करत असाल तर हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

खरंतर जेवण कधीही घाई मध्ये करू नये याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. तुम्ही पटकन जेवण करून तुमचा वेळ वाचवत आहात असे तुम्हाला वाटत असेल तर असे केल्याने तुम्ही स्वतः आजारपण मागवून घेत आहात. डॉ. किरण गुप्ता यांच्याकडून जाणून घेऊ की घाई मध्ये जेवण न करण्याचे काय कारण आहे.

रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते

डॉ. किरण गुप्ता यांनी सांगितले आहे की घाई मध्ये जेवण केल्याने रक्तातील साखरेवर परिणाम होतो. खरं पाहायला गेले तर जेव्हा आपण जेवण पटकन खातो तेव्हा रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

पचना संबंधित समस्या निर्माण होणे

घाई घाई मध्ये जेवण केल्याने पचनाच्या समस्या देखील उद्भवू शकतात. कारण घाई मध्ये जेवण केल्यास शरीर योग्यरीत्या अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला जळजळ, गॅस, पोटदुखी आणि इरिटेबल बॉवेल सिंड्रोम यासारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय घाईत जेवण केल्याने हवा गिळण्याची समस्या देखील होऊ शकते. ज्यामुळे पचनाच्या समस्या वाढू शकतात आणि आतड्यांचे आरोग्य बिघडू शकते.

हृदयाला धोका निर्माण होतो

घाई मध्ये जेवण केल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. घाई मध्ये जेवल्याने जळजळ होऊ शकते तसेच आतड्यातील बॅक्टेरियाची असंतुलन असू शकते. ज्यामुळे ह्रदयरोगाशी संबंधित समस्या वाढू शकतात. याशिवाय घाई मध्ये जेवण केल्यास रक्तदाबही वाढू शकतो त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.