AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकांनो… मुलांशी कसं वागावं हे जरा समजून घ्या! या चुका टाळा…

मुलांच्या शारीरिक आरोग्यासोबतच त्यांचे मानसिक आरोग्यदेखील तितकेच महत्वाचे असते. आपल्याला काही सामान्य वाटत असलेल्या सवयीदेखील मुलांच्या मानसिक आरोग्यावर दुरगामी परिणाम करु शकतात. मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी काही टीप्स समजून घेणे आवश्‍यक आहे.

पालकांनो... मुलांशी कसं वागावं हे जरा समजून घ्या! या चुका टाळा...
Child Care Tips
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Apr 11, 2022 | 1:00 PM
Share

मुंबई : ज्याप्रमाणे वयामुळे आपले शरीर थकत असते, त्याच पध्दतीने वयानुसार आपल्या मानसिक आरोग्यावरही (mental health) परिणाम होत असतो. एका विशिष्ट वयात ज्येष्ठ नागरिकांमध्ये अनेक मानसिक आजारांची लक्षणे दिसू लागतात. याला जीवनातील अनेक घटक कारणीभूत असले तरी, तणावपूर्ण जीवन हे यातील महत्वाचे व मुख्य कारण सांगता येईल. वाढत्या वयात मानसिक आजार (Mental illness) सामान्य असले तरी, तेच आजार लहान मुलांमध्ये दिसून येत असतील तर याकडे गांभीर्याने पाहणे आवश्‍यक ठरत असते. लहानपणापासून मुलांमध्ये मानसिकदृष्ट्या दुबळेपणा आल्यास याचे दीर्घ परिणाम (Long lasting results) त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात त्रासदायक ठरु शकतात. त्यामुळे मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहिल, यासाठी पालकांनी विशेष काळजी घेणे आवश्‍यक आहे.

धावपळीच्या जगात अनेक पालक आपल्या मुलांना पुरेसा वेळ देत नाही. त्यांच्या भावना समजून घेण्यास ते अपयशी ठरत असतात. त्याच प्रमाणे वागणूक अतिशय कठोर ठेवत असल्याने मुलांच्या भावना समजून घेण्याची पालकांची मानसिक तयारी नसते. परंतु अशा पध्दतीने मुलांच्या मानसिकतेवर खूप वाईट परिणाम होउ शकतो. मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्याच्याशी संवाद साधावा, त्यांच्या मनात काय चालू आहे, हे ओळखून त्यांच्याशी वागावे, अशाने मुलांमध्ये आणि पालकांमध्ये एक घट्ट नाते तयार होउन मुलं मन मोकळं करु शकतील.

नेहमी सकारात्मक राहा

अनेकदा मुलं हट्ट करतात, एखादी गोष्ट पाहिजे असल्यास ती मिळेपर्यंत ते शांत होत नाहीत. अशा वेळी पालक त्यांच्यावर संताप करतात, अनेकदा मुलांना मारही खावा लागत असतो. परंतु हे अतिशय चुकीचे आहे. अशा वागणुकीमुळे मुलांमध्ये पालकांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते. त्यामुळे मुलांशी नेहमी सकारात्मक बोला, त्यांना शांतपणे समजवून सांगा.

मुलांना ‘सोशल’ करा

अनेकदा काही कारणांमुळे मुलांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होऊ शकते. अशा वेळी तुम्ही त्यांना मोकळ्या हवेत घेउन गेले पाहिजे. त्यांच्या वयाच्या मुलांसोबत त्यांना खेळू द्यावे, त्यांना समाजात मिसळू द्यावे, मुलं जेवढी सोशल होतील तेवढ त्यांचे व्यक्तीमत्व अधिक खुलण्यास मदत होते. मुलांना घरातच ठेवल्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास कमी होतो. ऐवढेच नाही तर, दुसर्याशी बोलताना ते प्रचंड घाबरतात, त्याच्या मनात भीती निर्माण होते.

इतर बातम्या

Photo Gallery | यशस्वी प्रयोगामुळे आशा वाढल्या; प्रयोगशाळेत निर्मिती केलेल्या शुक्राणूच्या मदतीने जन्मली मुले ; जाणून घ्या कसे

Health Care | तुम्हाला वारंवार तहान लागतेय? ‘या’ गंभीर आजाराचेही असू शकते लक्षण

World Parkinson’s Day : जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणजे काय ? जाणून घ्या एका क्लिकवर

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली