AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय

अनेकांना वारंवार तोंड येण्याची समस्या असते. परंतू या समस्येकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. कारण त्यामुळे पुढे गंभीर आजार होऊ शकतात. रामदेव बाबांनी यावर आयुर्वेदिक उपाय सांगितले आहेत.

तोंडात वारंवार अल्सर होत आहे, रामदेव बाबांनी सांगितले आयुर्वेदिक उपाय
Baba Ramdev
| Updated on: Nov 16, 2025 | 8:17 PM
Share

अनेक लोक वारंवार तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. त्यामुळे त्यांना जेवणाचा नीट आस्वाद घेता येत नाही. ही समस्या कमजोर पचन यंत्रणा, विटामिन्स बी -12, आयर्न वा फोलिक एसिडच्या कमतरतेने, शरीरातील उष्णता वाढणे, तणाव, अधिक मसालेदार वा खारट जेवण,धुम्रपान आणि अपुरी झोप यामुळे देखील होऊ शकते. काही वेळा धारदार दांतामुळेही तोंडात जखमा होत असतात. हवामान बदल आणि हार्मोन असंतुलन देखील तोंडातील व्रणाला कारणीभूत असते. रामदेव बाबा यांनी आयुर्वेदिक पद्धतीने तोंडातील व्रण आणि त्यापासून बचावाचे उपाय सांगितले आहेत.

जर वारंवार तोंड येत असेल किंवा व्रण पडत असतील तर त्यांचा वेळीच उपाय करायला हवा. अन्यथा नंतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अन्न गिळणे, बोलणे आणि दात स्वच्छ करताना देखील त्रास होत असतो. वारंवार तोंडाचा अल्सर झाल्याने तोंडात संक्रमण वाढ शकते. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येणे आणि चव बिघडणे सारख्या अडचणी येऊ शकतात. बराच काळ याकडे दुर्लक्ष केले तर तुमची इम्युन सिस्टीम देखील कमजोर होऊ शकते. शरीरात सूज येऊ शकते. वेदना आणि जळजळ यामुळे तुम्ही नीट जेऊ शकणार नाही. त्यामुळे वजन कमी होणे किंवा कमजोरी येणे असे त्रास होऊ शकतात.त्यामुळे तोंडाच्या अल्सरचा वेळीच उपचार करणे गरजेचे असते.

बचावासाठी आयुर्वेदिक उपाय –

तोंडाच्या अल्सरवर आराम मिळण्यासाठी एलोवेरा सर्वात उत्तम उपाय असल्याचे रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. याचे रोज सकाळी उपाशी पोठी सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते. पचन मजबूत होते आणि इम्युन सिस्टीम मजबूत होते. तोंडाच्या व्रणांवर एलोवेरा जेल लावल्याने जळजळ,वेदना आणि सूज यावर लागलीच आराम मिळतो. याशिवाय शरीर थंड होण्यासाठी कलींगड, काकडी, नारळपाणी आणि ताक सारख्या थंड पेयांचे सेवन करायला हवे. मसालेदार, तळलेले आणि अत्यंत खारट, आबंट पदार्थ वर्ज्य करावेत.

दररोज पुरेसे पाणी प्यावे, संतुलित आहार करावा, नियमित योग आणि ध्यान धारण करावी त्यामुळे देखील ताण कमी होऊन आराम मिळतो. तणाव कमी करणे, झोप पूर्ण घेणे आवश्यक आहे. कारण जास्त तणाव आणि झोपेच्या कमतरतेने तोंड येण्याची समस्या वारंवार येऊ शकते. आयुर्वेदिक उपाय आणि लाईफस्टाईल मधील बदलाने तोंडाच्या आरोग्याचे रक्षण होते. आणि माऊथ अल्सरची समस्या बरी होते.

हे देखील आवश्यक –

तोंडाची स्वच्छता नीट राखा, दिवसातून दोन वेळा ब्रश करा

अधिक आबंट फळे किंवा खूप गरम अन्न खाणे टाळा.

पचन सुधारण्यासाठी फायबर युक्त डाएट घ्या

धूम्रपान,मद्य आणि तंबाखूपासून दूर राहा

वारंवार तोंड येत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्या

Follow Us
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?
अशोक खरात सोबत शिंदे, चाकणकरांचे कॉल्स; अंजली दमानियांकडे CDR?.
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.