AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Tips : रात्री उशिरा जेवण करणं टाळा… ‘या’ त्रासापासून स्वत:चा बचाव करा…

सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे अनेकदा वेळी अवेळी खाल्लं जातं. त्याचा शरिरावर परिणाम होण्याची भिती असते. कधीतरी उशीरा जेवणं ठीक आहे. पण वारंवार असं व्हायला लागलं तर त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज रात्री उशिरा जेवण करणं टाळलं पाहिजे.

Health Tips : रात्री उशिरा जेवण करणं टाळा... 'या' त्रासापासून स्वत:चा बचाव करा...
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: Apr 04, 2022 | 8:20 AM
Share

मुंबई : सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे (Busy Lifestyle) अनेकदा वेळी अवेळी खाल्लं जातं. त्याचा शरिरावर परिणाम होण्याची भिती असते. कधीतरी उशीरा जेवणं ठीक आहे. पण वारंवार असं व्हायला लागलं तर त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होतो. त्यामुळे दररोज रात्री उशिरा जेवण करणं (Late Meal) टाळलं पाहिजे. रात्री 8 नंतर काहीही खाऊ नये, कारण रात्री उशिरा जेवल्याने अन्न नीट पचत नाही आणि त्यामुळेच पोट वाढणं वजन वाढणं, अश्या समस्या निर्माण होतात, असं तज्ज्ञ सांगतात. फास्ट फूड खाणं टाळायला हवं. हे वारंवार सांगितलं जातं. पण अनेकदा पार्टी किंवा इतर गोष्टींमुळे जेवण उशिरा होतं. त्यासोबत कोल्ड ड्रिंकही घेतलं जातं. हे शरिरासाठी चांगलं नाही. बाहेरचं अन्न खाणं टाळायला हवं. रात्रीचं जेवणं झालं की थोडं चालायला हवं. ते आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.

तुम्हीही रोज रात्री उशिरा जेवण करत असाल तर तुम्हाला अॅसिडिटी होऊ शकते. जर तुम्ही दररोज रात्री उशिरा जेवण केलं तर त्यामुळे छातीत जळजळ होते. कधीकधी पोटाशी संबंधित इतर समस्यादेखील उद्भवू लागतात. तुम्हाला कदाचित याची सवय नसेल, पण असे बरेच लोक आहेत जे रात्री खूप जड अन्नपदार्थ खातात. जेवल्यानंतर झोपायलाच पाहिजे असा विचार करून ते जड अन्न सेवन करतात पण आयुर्वेदानुसार रात्री उशिरा जड अन्न खाणे टाळावे. त्यामुळे पोट खराब होऊ शकतं शिवाय गॅसचाही त्रास होऊ शकतो.

आयुर्वेदानुसार रात्री जेवणाची योग्य वेळ म्हणजे सात वाजताची. सात वाजता न जेवता रात्री उशिरा अकरा-बारा वाजता जेवणारे बरेच लोक आहेत. रात्री उशिरा जेवण केल्याने एक नाही तर अनेक समस्या निर्माण होतात.

भारतीय आयुर्वेदात प्रत्येक खाण्यापिण्याची एक वेळ ठरलेली आहे. सूर्यास्ताच्या आधी कोणत्या गोष्टी खाव्यात आणि सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी खाव्यात हे देखील एक संपूर्ण शास्त्र आहे. दिवसाच्या कोणत्या वेळी काय सेवन करणे चांगले? सूर्यास्तानंतर काय खाऊ नये आणि सूर्योदयानंतर काय खावे. आधुनिक जीवनशैलीत, लोकांना या गोष्टी माहित नाहीत किंवा ते त्यांचे पालन करत नाहीत. आयुर्वेदाचे हे सर्व नियम पूर्णपणे समजून घेणे आणि त्यांचे पालन करणे आपल्यासाठी शक्य नाही. पण यापैकी एक गोष्टही आपण आयुष्यात पाळू शकलो तर आरोग्यावर बऱ्याच अंशी सकारात्मक परिणाम होतो.

संबंधित बातम्या

AC : उन्हाळ्यात एसीचा जास्त वापर करताय? सावधान! तुम्हाला ‘या’ गंभीर समस्यांचा सामना करायला लागू शकतो…

Health Tips : टोमॅटो आणि काकडीचा रस चेहऱ्यासाठी आहे खूपच उपयुक्त, जाणून घ्या फायदे…

Red Grapes : लाल द्राक्ष चेहऱ्यासाठी प्रचंड लाभदायी, जाणून घ्या फायदे…

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...