AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी? जेवणाच्या आधी की नंतर? पाणी पिण्याचं तंत्र घ्या जाणून

correct time to drink water: आपले शरीर सुमारे 60-70% पाण्याने बनलेले आहे. पाण्यामुळे आपल्या शरीरातील अवयव योग्यरित्या कार्य करतात. पाणी केवळ शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर पचनसंस्था सुधारण्यास देखील मदत करते. चला तर जाणून घेऊया पाणी पिण्याची योग्य वेळ काय.

कधी? जेवणाच्या आधी की नंतर? पाणी पिण्याचं तंत्र घ्या जाणून
| Edited By: | Updated on: Feb 14, 2025 | 4:15 PM
Share

आपल्या दैनंदिन दिनचर्येचा आणि खाण्याच्या सवयींचा आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो. योग्य वेळी अन्न खाणे आणि पाणी पिणे शरीराची पचनसंस्था मजबूत करण्यास मदत होते. लोक अनेकदा विचारतात की जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य आहे की नाही? आयुर्वेदात यावर अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुम्हाला पोट बिघडणे, अपचन, आम्लता, जडपणा किंवा लठ्ठपणा यासारख्या समस्या येत असतील तर याचे एक कारण चुकीच्या वेळी पाणी पिणे असू शकते. आयुर्वेदानुसार, अन्न आणि पाणी घेण्याची योग्य वेळ जाणून घेणे महत्वाचे आहे. जेणेकरून शरीराचे कार्य सुरळीत राहाते आणि तुमचं आरोग्य निरोगी राहाते.

आपले शरीर सुमारे 60-70% पाण्याने बनलेले आहे. शरीरातील पाणी आपल्या अवयवांना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. पाणी केवळ शरीराला हायड्रेट ठेवत नाही तर तुमची पचनसंस्था, रक्ताभिसरण, त्वचेचं आरोग्य आणि शरीरातील उर्जेची पातळी देखील राखते, परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की पाणी कधी प्यावे. जेवणापूर्वी, दरम्यान की नंतर? आयुर्वेदानुसार, पाणी पिण्याची वेळ खूप महत्वाची आहे. जर पाणी चुकीच्या वेळी प्यायले तर त्याचा तुमच्या पचनक्रियेवर गंभीर परिणाम होतो आणि शरीरात अनेक समस्या निर्माण होतात.

जर तुम्ही जेवण्यापूर्वी पाणी प्यायले तर ते तुमची भूक कमी करू शकते. आयुर्वेदात असे म्हटले आहे की जेवणापूर्वी 30-40 मिनिटे पाणी पिल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि पचनक्रिया सुधारते. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने पचनशक्ती कमकुवत होते. यामुळे अन्नाचे योग्य पचन होण्यास अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे गॅस, अपचन आणि आम्लता सारख्या समस्या उद्भवू शकतात. जेवणानंतर लगेच थंड पाणी पिणे हानिकारक मानले जाते. कारण ते शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते. आयुर्वेदात, जेवणानंतर किमान 30-45 मिनिटांनी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुमच्या पचनसंस्थेचे कार्य सुरळीत होण्यास मदत होते आणि पोषक तत्वे योग्यरित्या शोषून घेते. पचनासाठी कोमट पाणी किंवा सामान्य तापमानाचे पाणी पिणे सर्वोत्तम मानले जाते. चुकीच्या वेळी पाणी पिल्याने पचन प्रक्रिया मंदावू शकते. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्यास ते पोटात तयार होणारा जठरासंबंधी रस पातळ करते, ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. जेवणापूर्वी पाणी पिल्याने भूक कमी लागते, ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळू शकत नाहीत.

निरोगी आयुष्यासाठी योग्य सवयी

1) जेवणाच्या किमान 30 मिनिटे आधी पाणी प्या.

2) जेवताना जास्त पाणी पिणे टाळा.

3) जेवणानंतर फक्त ३०-४५ मिनिटांनंतर पाणी प्या.

4) गरम पाणी किंवा कोमट पाणी पचनासाठी अधिक फायदेशीर असते.

5) झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळा, कारण त्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो

अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा
अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचा मोठा दावा.
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल
नारायण राणे यांची तब्येत बिघडली, मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल.
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब
अजित पवार यांनी सांगितलेल्या 3 निर्णयावर कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब.
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान
चंद्रपुरात भाजप- ठाकरे गटाची हातमिळवणी, सुषमा अंधारे यांचे मोठे विधान.
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य
अगोदर दिल्लीत बैठक, आता विलीनीकरणार फडणवीसांचे मोठे भाष्य.
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?
अजित पवारांच्या शेवटच्या सभेच्या ठिकाणी काय लागला निकाल?.
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट
सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारताच रोहित पवार यांचं ट्विट.
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ
जिल्हा परिषदेत महायुती सुस्साट, मविआचा सुपडा साफ.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ट्रॅफिक पोलिस सरसावले.
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू....
नार्वेकरांना अधिकार देणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची धुरा डाकू.....