AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात काय सगळ्यात जास्त फायदेशीर?

झोपणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे यामुळे आता शरीरावर विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे लोकांना लठ्ठपणा, गॅस-ॲसिडिटी, मधुमेह, हाय बीपी आणि हार्ट अटॅक सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. पोट निरोगी ठेवलं तर वाढत्या वजनासह सर्व आजारांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात काय सगळ्यात जास्त फायदेशीर?
weight lossImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Apr 12, 2023 | 5:41 PM
Share

मुंबई: विनाकारण खाणे आणि झोपणे आणि शारीरिक हालचाली कमी करणे यामुळे आता शरीरावर विपरीत परिणाम दिसू लागले आहेत. यामुळे लोकांना लठ्ठपणा, गॅस-ॲसिडिटी, मधुमेह, हाय बीपी आणि हार्ट अटॅक सारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. पोट निरोगी ठेवलं तर वाढत्या वजनासह सर्व आजारांवर बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात कोशिंबीर म्हणून खाल्ल्या जाणाऱ्या काकडीच्या अशा अनेक आयुर्वेदिक गुणधर्मांबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचे शरीर स्लिम-ट्रिम बनवू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते काकडीत अँटी डायबेटिक आणि अँटी ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. तसेच लिपिड कमी करण्याचे गुणधर्मही यात आढळतात. काकडीचे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन सी, के आणि इतर पोषक तत्वे देखील मिळतात. ज्यामुळे आपलं आरोग्य निरोगी राहतं. चला तर मग जाणून घेऊया शरीरातील चरबी कमी करण्यासाठी काकडी कशी उपयोगी येते.

सहज पचते

जर तुम्हाला तुमच्या शरीरावरील चरबी कमी करायची असेल तर तुम्ही कोशिंबीर म्हणून दररोज सकाळ-संध्याकाळ काकडी खाऊ शकता. भाकरी-भाजी किंवा डाळ-भाताबरोबर काकडी खाल्ल्याने पोट लवकर भरते. हे सहज पचते, जेणेकरून शरीरातील चरबी वाढण्याची समस्या उद्भवत नाही.

शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकले जातात

काकडी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, ज्यामुळे शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे गॅस-अॅसिडिटी दूर होते तसेच पोट फुगण्याची समस्या ही दूर होते.

फायबर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे

ज्यांना बद्धकोष्ठतेची तक्रार आहे, त्यांच्यासाठी काकडी खाल्ल्याने बरेच फायदे होतात. खरं तर यात फायबर भरपूर प्रमाणात आढळतं, ज्यामुळे पोटाचं चयापचय मजबूत होतं. यात भरपूर पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही,

शरीरातील चरबी वाढत नाही

शरीरातील चरबी वाढवण्यात साखर महत्त्वाची भूमिका बजावते. पण काकडीमध्ये नगण्य नैसर्गिक साखर असते, जी भरपूर खाऊनही शरीरातील चरबी वाढवत नाही. हे लो कॅलरीफूड आहे, त्यामुळे आपण आपल्या आहारात काकडीचा समावेश करून आरोग्य बनवू शकता.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप
आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...
कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, नेमकं काय घडतंय?
Dattatray Bharne | कर्जमाफीवरून सरकारने अखेर बैठक बोलवली, रोहित पवारांच्या उपोषणामुळे हालचाली वाढल्या, नेमकं काय घडतंय?