AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips : उन्हाळ्यात या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा आणि निरोगी राहा!

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर मानला जातो. म्हणूनच सकाळी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. ते तुमची ऊर्जा पातळी राखण्यासाठी काम करते. तुम्ही तळलेले आणि अस्वास्थ्यकर अन्नाऐवजी (Food) काही आरोग्यदायी पर्याय निवडू शकता जे ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करतात.

Health Care Tips : उन्हाळ्यात या पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा आणि निरोगी राहा!
निरोगी राहण्यासाठी नाश्त्यामध्ये या पदार्थांचा समावेश करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 9:49 AM
Share

मुंबई : सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी (Health) अत्यंत फायदेशीर मानला जातो. म्हणूनच सकाळी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. ते तुमची ऊर्जा पातळी राखण्यासाठी काम करते. तुम्ही तळलेले आणि अस्वास्थ्यकर अन्नाऐवजी (Food) काही आरोग्यदायी पर्याय निवडू शकता जे ऊर्जा पातळी वाढवण्यास आणि चयापचय गतिमान करण्यास मदत करतात. तुम्ही पपई, भिजवलेले बदाम आणि भाज्यांचे रस इत्यादी अनेक गोष्टी सकाळी नाश्त्यात (Breakfast) घेऊ शकता. हे वजन कमी करण्यास देखील मदत करतील. चला जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत जे तुम्ही नाश्त्यात रिकाम्या पोटी घ्यावेत.

या 5 आरोग्यदायी पदार्थांचा नाश्त्यामध्ये समावेश करा!

पपई सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे. पपईमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. यामुळे आपल्याला बऱ्याच वेळ भूक लागत नाही आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहण्यास मदत होते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. यामुळेच आपण आपल्या सकाळच्या नाश्त्यामध्ये पपईचा नक्कीच समावेश करायला हवा.

कलिंगड उन्हाळ्यात दिवसभर हायड्रेट राहण्यासाठी शरीराला भरपूर इलेक्ट्रोलाइट्सची गरज असते. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, लाइकोपीन आणि फ्रक्टोज मुबलक प्रमाणात असते. त्यात कॅलरीज खूप कमी असतात. कलिंगड रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. यामुळे कलिंगड सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या.

भिजवलेले बदाम सकाळी मूठभर भिजवलेले बदाम खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. व्यायाम किंवा जिम करणारे लोक जास्त करून भिजवलेले बदाम खातात. मात्र, सर्वांनीच सकाळच्या नाश्त्यामध्ये भिजवलेल्या बदामाचा समावेश करायला हवा. बदाम, अक्रोड आणि अंजीरमध्ये भरपूर प्रथिने असतात. हे शरीराला ऊर्जावान ठेवण्याचे काम करते.

जिऱ्याचे पाणी रिकाम्या पोटी जिरे पाणी आणि ओवा पाणी यांसारखा पाचक पेय घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्यात खनिजे, एंजाइम आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. हे चयापचय सुधारते. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

भाज्यांचे रस तुम्ही गाजर, बीट आणि हिरव्या भाज्यांपासून बनवलेला रस सकाळी पिऊ शकता. विशेष म्हणजे हिरव्या भाज्यांचा ज्यूस सकाळी नाश्त्यामध्ये पिणे आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. या ज्यूसमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि फायबरने मोठ्या प्रमाणात आढळते. हे ज्यूस पचनसंस्था, त्वचा आणि केस निरोगी ठेवतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss : ‘या’ फळांमुळे उन्हाळ्यात वजन कमी होण्यास मदत होईल, वाचा सविस्तर!

आयुर्वेदानुसार त्वचा आणि केसांची अशा प्रकारे काळजी घ्या आणि समस्या दूर करा!

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.