AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत तयार करणार एचआयव्हीवरील सर्वात स्वस्त औषध, ३५ लाखाऐवजी इतक्या रुपयांना मिळणार

भारत सरकार आधीपासूनच एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचार मोहीम राबवत आहे. रुग्णांना मोफत चाचणी, समुपदेशन आणि औषधे दिली जात असतात. २०३० पर्यंत देशातून एचआयव्ही/एड्स पूर्णपणे उच्चाटन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

भारत तयार करणार एचआयव्हीवरील सर्वात स्वस्त औषध, ३५ लाखाऐवजी इतक्या रुपयांना मिळणार
| Updated on: Sep 26, 2025 | 10:44 PM
Share

HIV drug India: भारत एचआयव्ही सारख्या दुर्धर आजारावर स्वस्तातले औषध तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरात एचआयव्ही (ह्यूमन इम्यूनोडेफिशिएन्सी व्हायरस-एड्स) सारख्या आजारात वापरले जाणारे औषध आता भारतात सर्वात स्वस्तात उपलब्ध होणार आहे. हे औषध अमेरिकेत जवळपास ३५ लाख रुपयांना मिळते ते आता भारतात केवळ ३,३०० रुपयांना उपलब्ध होणार आहे. चला तर पाहूयात हे औषध इतके स्वस्त कसे मिळणार ते…

गरीब आणि विकसनशील देशांचा सर्वात मोठा फायदा

हे नवीन औषध बाजारात आल्याने सर्वात लाभ गरीब आणि विकसनशील देशातील रुग्णांना होणार आहे. या देशांमध्ये हे महागडे औषध खरेदी करणे अवघड झाले होते. त्यामुळे या गरीब राष्ट्रामधील लोकांसाठी हे औषध जीवन रक्षक सिद्ध होणार आहे. भारत आधीपासूनच जेनेरिक औषधाचे उत्पादन करणारा जगातला सर्वात मोठे केंद्र आहे. आणि आता एचआयव्हीचे हे औषध तयार करुन भारत आणखी एक ऐतिहासिक पाऊल टाकणार आहे.

काय आहे विशेष ?

अमेरिका, कनाडा, यूरोप आणि ऑस्ट्रेलियात आधीच उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधाचे हे जेनेरिक व्हर्जन असणार आहे. ब्रँडेड औषधांची किंमत इतकी जादा आहे की सामान्य रुग्णांना त्यास खरेदी करणे देखील अशक्य आहे. परंतू भारतात तयार होणाऱ्या जेनेरिक व्हर्जनमुळे याची किंमत इतकी कमी झाली आहे.त्यामुळे गरुजूंना हे औषध उपलब्ध करणे शक्य होणार आहे.

केव्हा मिळणार हे औषध ?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे औषध बाजारात साल २०२७ मध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. या स्वस्त औषधांना हजारो लोकांना नवीन जीवन मिळणार आहे. आणि एड्स विरोधात सुरु असलेल्या जागतिक लढ्याला आणखी मजबूती मिळणार आहे.

भारतात एचआईव्हीची स्थिती

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे २५.४ लाख लोक एचआयव्हीने संक्रमित आहेत. यातील दरवर्षी सुमारे ६८ हजार लोक नवीन रुग्ण म्हणून दाखल होतात. तसेच २०२३-२४ मध्ये देशात सुमारे ३५,८७० जणांचा एचआयव्ही संबंधित आजारांनी मृत्यू झाला आहे. या आकडेवारीवरुन भारतात एचआयव्ही आजही आरोग्यासाठी मोठे आव्हान बनलेला आहे.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.