.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter care: हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की थंड पाणी ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करावी की नाही हे बहुतांश लोक ठरवू शकत नाहीत. याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेऊया.

Winter care: हिवाळ्यात आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की थंड पाणी ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
| Updated on: Nov 15, 2022 | 3:27 PM
Share

नवी दिल्ली – उत्तर भारतात हिवाळा (winter season) सुरू झाला असून अनेक लोकांना हा ऋतू खूप आवडतो. एकीकडे लोक या ऋतूचा आनंद घेत आहेत, मात्र दुसरीकडे काही लोकांना सर्दी- खोकला अशा आजारांचा (cough and cold) सामनाही करावा लागत आहे. थंडीचा त्रास टाळण्यासाठी काही लोक गरम पाण्याने आंघोळ (hot water bath) करतात तसेच गरम पाणीही पितात. पण काही लोकांना मात्र थंडीच्या दिवसात आंघोळीसाठी गरम पाणी वापरावे की गार असा प्रश्न पडतो. थंडीच्या दिवसात थंड पाण्याने का गरम पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर आहे, याबद्दल बहुतेक लोक संभ्रमात असतात. तुम्हालाही असा प्रश्न पडत असेल, तर याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे ते जाणून घेऊया.

तज्ज्ञ काय सांगतात ? उत्तर प्रदेशातील प्रेम रघू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभिनव राज (MD) यांनी याबाबत माहिती दिली. हिवाळ्यात कोमट पाण्याने अंघोळ करणं हे फायदेशीर आहे, असे आयुर्वेदात सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि सर्दी व शरीर आखडण्याची समस्याही दूर होते. कोमट पाण्यामुळे शरीर चांगल्या रितीने स्वच्छ होते व तुम्हाला एकदम फ्रेश वाटते. आंघोळ करताना जास्त गरम पाणी वापरू नये, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. ज्या लोकांना त्वचेचा एखादा आजार आहे, त्यांनी गरम पाण्याचा वापर करणे टाळावे. अशा लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करावा.

गार पाणी हानिकारक असते का ?

हिवाळ्यात थंड पाणी वापरणे हानिकारक नाही, असे आयुर्वेदात नमूद केल्याचे डॉ. अभिनव राज यांनी सांगितले. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती मजबूत आहे आणि ज्यांना सर्दीचा त्रास नाही, ते थंड पाण्यानेही आंघोळ करू शकतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे व ज्यांना लवकर सर्दी होते, अशा लोकांनी थंड पाणी टाळावे.

थंडीत गरम पाणी प्यावे का ?

कोमट पाणी हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे, असे आयुर्वेदात म्हटले आहे. कोमट पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात साठलेली चरबी बाहेर पडते आणि शरीर निरोगी राहते. कोमट पाणी पिणे हे प्रत्येक ऋतूमध्ये फायदेशीर असते. विशेषतः हिवाळ्यात कोमट पाणी आवर्जून प्यायले पाहिजे. हिवाळ्यात होणारे आजार टाळण्यासाठी दररोज व्यायाम करावा व चांगले अन्न सेवन करावे. या ऋतूमध्ये पचनसंस्था चांगली होते आणि जड अन्न सहज पचवता येऊ शकतं.

जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने होते नुकसान

प्रत्येक व्यक्तीने जेवणापूर्वी आंघोळ करावी, असे आयुर्वेदात म्हटले आहे. मात्र ते शक्य नसेल तर जेवणानंतर 2 तासांनी आंघोळ करावी. जेवणानंतर लगेच अंघोळ केल्यास पचनक्रिया बिघडू शकते आणि सांधेदुखीचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जेवणानंतर लगेच आंघोळ करणे तसेच व्यायाम करणे टाळावे.

Follow Us
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय