त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी या 3 ड्रायफ्रूट्सचा दररोजच्या आहारात नक्कीच समावेश करा!

जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचे काम करते. हे टॅनिंग दूर करते. स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्याचे काम करते. हे टाळूच्या समस्या जसे की खाज सुटणे आणि कोंडा टाळते.

त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी या 3 ड्रायफ्रूट्सचा दररोजच्या आहारात नक्कीच समावेश करा!
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 6:30 AM

मुंबई : चेहरा आणि केस (Hair)  निरोगी ठेवण्यासाठी निरोगी आणि चांगली जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे. निरोगी केस आणि त्वचेसाठी तुम्ही आहारात अनेक प्रकारचे पदार्थ समाविष्ट करू शकता. तुम्ही अनेक प्रकारच्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता. ते केस आणि त्वचेचे सखोल पोषण करण्याचे काम करतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ड्रायफ्रूट्स (Dry fruits) खाणे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. यामुळेच लहान मुलांच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा जास्तीत-जास्त समावेश करावा, असे डाॅक्टर नेहमीच सांगतात. फक्त ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी (Health) नव्हेतर ते आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ड्रायफ्रूट्स मदत करतात.

मनुका

मनुका अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी सुकामेवा आहे. त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. मनुका केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे त्वचा तरुण राहते. हे कोरडे केस आणि केस गळण्याची समस्या टाळते. विशेष म्हणजे मनुका वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करतो. मनुक्याच्या पाण्याचे दररोज सेवन केले तर वजन कमी होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

जर्दाळू

जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचे काम करते. हे टॅनिंग दूर करते. स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्याचे काम करते. हे टाळूच्या समस्या जसे की खाज सुटणे आणि कोंडा टाळते. यामुळे दररोजच्या आहारात नक्कीच जर्दाळूचा समावेश करा. जर आपण जर्दाळूचा फेसपॅक करून चेहऱ्याला लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

अंजीर

आपल्यापैकी अनेकांना अंजीर खाण्यास अजिबात आवडत नाहीत. मात्र, अंजीर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. अंजीरमध्ये लोह, जीवनसत्त्वे, आहारातील फायबर आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि मुरुम दूर होतात. हे केस मजबूत आणि चमकदार बनवते. जर आपल्याला अंजीर खायला आवडत नसतील तर आपण अंजीरचा ज्यूस करून देखील आहारात समाविष्ट करू शकता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.