AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी या 3 ड्रायफ्रूट्सचा दररोजच्या आहारात नक्कीच समावेश करा!

जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचे काम करते. हे टॅनिंग दूर करते. स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्याचे काम करते. हे टाळूच्या समस्या जसे की खाज सुटणे आणि कोंडा टाळते.

त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी या 3 ड्रायफ्रूट्सचा दररोजच्या आहारात नक्कीच समावेश करा!
| Edited By: | Updated on: Aug 03, 2022 | 6:30 AM
Share

मुंबई : चेहरा आणि केस (Hair)  निरोगी ठेवण्यासाठी निरोगी आणि चांगली जीवनशैली अत्यंत आवश्यक आहे. निरोगी केस आणि त्वचेसाठी तुम्ही आहारात अनेक प्रकारचे पदार्थ समाविष्ट करू शकता. तुम्ही अनेक प्रकारच्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करू शकता. ते केस आणि त्वचेचे सखोल पोषण करण्याचे काम करतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ड्रायफ्रूट्स (Dry fruits) खाणे आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. यामुळेच लहान मुलांच्या आहारात ड्रायफ्रूट्सचा जास्तीत-जास्त समावेश करावा, असे डाॅक्टर नेहमीच सांगतात. फक्त ड्रायफ्रूट्स हे आपल्या आरोग्यासाठी (Health) नव्हेतर ते आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. केसांच्या आणि त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी ड्रायफ्रूट्स मदत करतात.

मनुका

मनुका अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी सुकामेवा आहे. त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. मनुका केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. त्यात वृद्धत्व विरोधी गुणधर्म आहेत. यामुळे त्वचा तरुण राहते. हे कोरडे केस आणि केस गळण्याची समस्या टाळते. विशेष म्हणजे मनुका वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करतो. मनुक्याच्या पाण्याचे दररोज सेवन केले तर वजन कमी होण्यास मदत होते.

जर्दाळू

जर्दाळूमध्ये व्हिटॅमिन ई असते. हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्याचे काम करते. हे टॅनिंग दूर करते. स्कॅल्पमध्ये रक्त परिसंचरण सुधारण्याचे काम करते. हे टाळूच्या समस्या जसे की खाज सुटणे आणि कोंडा टाळते. यामुळे दररोजच्या आहारात नक्कीच जर्दाळूचा समावेश करा. जर आपण जर्दाळूचा फेसपॅक करून चेहऱ्याला लावला तर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

अंजीर

आपल्यापैकी अनेकांना अंजीर खाण्यास अजिबात आवडत नाहीत. मात्र, अंजीर हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. अंजीरमध्ये लोह, जीवनसत्त्वे, आहारातील फायबर आणि कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे त्वचेवरील डाग, सुरकुत्या आणि मुरुम दूर होतात. हे केस मजबूत आणि चमकदार बनवते. जर आपल्याला अंजीर खायला आवडत नसतील तर आपण अंजीरचा ज्यूस करून देखील आहारात समाविष्ट करू शकता.

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.