Health Tips | शिळे अन्न खाताय? सावधान! ‘या’ गंभीर समस्यांचा करावा लागू शकतो सामना…

जेव्हा आपण ताजे अन्न शिजवतो, तेव्हा रूम टेम्प्रेचरवर थंड झाल्यावरच ते फ्रीजमध्ये ठेवतो. ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढू लागतात.

Health Tips | शिळे अन्न खाताय? सावधान! ‘या’ गंभीर समस्यांचा करावा लागू शकतो सामना...
जेव्हा आपण ताजे अन्न शिजवतो, तेव्हा ते रूम टेम्प्रेचरवर थंड झाल्यावरच ते फ्रीजमध्ये ठेवतो. ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढू लागतात.
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 2:48 PM

मुंबई : आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये, बहुतेक लोक दिवसभरातून एकदाच दोनवेळचे अन्न शिजवतात जेणेकरून त्यांना पुन्हा पुन्हा स्वयंपाक करावा लागत नाही. बर्‍याच वेळा व्यस्त शेड्यूलमुळे आपण जास्त अन्न शिजवतो आणि ते फ्रीजमध्ये ठेवतो आणि नंतर गरम करून पुन्हा एकदा खातो (Leftover food can harm your body and health).

बरेच लोक अन्न फेकण्याची वेळ येऊ नये, उरलेले अन्न खातात. जेणेकरून अन्नाचा अनादर होणार नाही, कारण आजही अनेक लोक भुकेल्या पोटी झोपतात. तर, काहींना बरेच दिवस अन्न पाहण्यास देखील मिळत नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ते अन्न फेकून देणे जीवावर येते. पण, शिळे अन्न खाण्याने आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, याची कल्पना आपल्याला नसते. चला तर, असे शिळे अन्न खाण्यामुळे कोणत्या समस्या उद्भवतात, ते जाणून घेऊया.

शिळ्या अन्नात जीवाणू वाढतात

जेव्हा आपण ताजे अन्न शिजवतो, तेव्हा रूम टेम्प्रेचरवर थंड झाल्यावरच ते फ्रीजमध्ये ठेवतो. ज्यामुळे त्यात बॅक्टेरिया आणि इतर हानिकारक सूक्ष्मजीव वाढू लागतात. रूम टेम्प्रेचरवर अन्न ठेवल्यानंतर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्यास त्यात बॅक्टेरिया वेगाने तयार होतात, जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. शिळे अन्न खाल्ल्याने अपचन, आंबटपणा आणि अन्न विषबाधा होण्याचा धोका देखील वाढतो (Leftover food can harm your body and health).

अन्न विषबाधा होण्याचा धोका

अन्न शिजवल्यानंतर काही तासांतच ते फ्रिजमध्ये ठेवले नाही तर, त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, ज्यामुळे अन्न खराब होऊ शकते. या हानिकारक बॅक्टेरियांमुळे अन्न विषबाधा अर्थात फूड पॉयझानिंग होण्याचा धोकाही वाढतो. विशेषत: शिळा भात खाऊ नये. कारण काही काळ रूम टेम्प्रेचरवर ठेवल्यानंतर तो भात पुन्हा गरम करून खाल्ल्याने अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो.

अतिसार

जर अन्न विषबाधा वाढली, तर उलट्या आणि पोटदुखीचा त्रास देखील वाढतो. यामुळे, शरीर निर्जलीकरण होण्यास सुरुवात होते आणि शरीरात पाण्याचा अभाव निर्माण होऊ शकतो. म्हणून, शिळे अन्न खाण्यापूर्वी आपल्या आरोग्याची काळजी घ्या.

कोणत्या ‘शिळ्या’ गोष्टींचे सेवन करू नये?

साग्याच प्रकारचे शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. विशेषत: अंडी, तांदूळ, सीफूड, चिकन आणि प्रक्रिया केलेले तेलकट पदार्थ शिळे खाणे टाळावे. या सर्व गोष्टींमध्ये बॅक्टेरिया पटकन वाढतात. म्हणून, या गोष्टी बर्‍याच दिवसांनंतर खाऊ नयेत.

(टीप : सदर माहिती ही सामान्य संशोधनावर आधारित असून, कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Leftover food can harm your body and health)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.