AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशा पद्धतीने जेवल्यास होणार नुकसान, पतंजलीचा सल्ला काय?

पतंजली आणि आयुर्वेद यांच्यातील संबंध आणि आरोग्यकर आहारासाठी अन्न संयोजनाचे महत्त्व यावर हा लेख प्रकाश टाकतो. आयुर्वेदानुसार अन्न सात धातूंनी बनलेले असते आणि चुकीचे अन्न शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम करते. वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांचे संतुलन राखणे महत्त्वाचे असून पतंजलीची उत्पादने यात मदत करतात.

अशा पद्धतीने जेवल्यास होणार नुकसान, पतंजलीचा सल्ला काय?
ramdev babaImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 11, 2025 | 3:14 PM
Share

स्वदेशी आणि आयुर्वेदाला प्रोत्साहन देणाऱ्या पतंजलीने आरोग्य आणि सौंदर्याशी संबंधित अनेक उत्पादने बनवली आहेत. यात वेगवेगळ्या प्रकारच्या जडीबुटींचा वापर केला आहे. दुसरीकडे बाबा रामदेव लोकांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगाचे शिक्षण देत आहेत. रामदेव बाबांचे सहकारी आणि पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण हे आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या औषधी वनस्पती तसेच आहारविषयक माहिती लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यांनी लिहिलेली ‘द सायन्स ऑफ आयुर्वेदा’ हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. जर आपण अन्नाच्या स्वभाव आणि योग्य संयोगाचा विचार न करता काहीही खाल्लं, तर ते आरोग्यदायी न ठरता हानिकारक ठरू शकतं, असं या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.

अन्न संयोजनाचा शरीरावर परिणाम

आयुर्वेदानुसार आपण जे काही खातो ते सात धातूंनी बनलेलं असतं आणि हे आपल्या शरीरात आयुष्यभर टिकून राहतं. त्यामुळे चुकीचं अन्न किंवा खराब अन्न पदार्थ केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यावरही वाईट परिणाम करू शकतात. अन्नाबाबत अज्ञान किंवा इच्छाशक्तीचा अभाव यामुळे आपण अनेकदा चुकीचे पदार्थ खातो, जे शरीरात असंतुलन निर्माण करतात आणि त्यामुळे विविध आजार उद्भवू शकतात.

खराब फूड कॉम्बिनेशन टाळा

आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ हे तीन दोष सांगितले गेले आहेत. जर यांचे संतुलन बिघडले, तर अनेक आजार उद्भवू शकतात. म्हणूनच पतंजलीमध्येही अशा अनेक उत्पादने आहेत जी या दोषांचं संतुलन राखण्यास मदत करतात. या पुस्तकात सांगण्यात आलं आहे की अन्नाचे योग्य संयोग हे आरोग्यासाठी वरदान ठरू शकतात, तर चुकीचे संयोग आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात. ज्या अन्नपदार्थांचे स्वभाव एकमेकांशी जुळत नाहीत, ते एकत्र खाल्ल्यास दोष वाढतात आणि आजार होण्याचा धोका वाढतो.

प्रकृतीनुसार आहार घ्या

आपण कोणत्या हंगामात काय खातो यावरही आरोग्य अवलंबून असतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची प्रकृती – वात, पित्त किंवा कफ प्रधान – यानुसारही अन्न सेवन करणं गरजेचं असतं.

अन्नाबाबतच्या लहान पण महत्त्वाच्या गोष्टी

सकाळी आंघोळ करण्याआधी अन्न खाणं, भूक नसताना खाणं किंवा भूक लागल्यानंतरही न खाणं यामुळे शरीराला नुकसान पोहोचू शकतं.

आयुर्वेदानुसार दही थंडीत खाणं फायदेशीर असतं, पण उष्णता, वसंत ऋतु आणि पावसाळ्यात दही खाणं टाळावं. दह्याबरोबर मीठ घालून खाणंही टाळावं. रात्री दही खाणं योग्य नाही.

साजूक तूप खाल्ल्यानंतर थंड पाणी पिऊ नये. त्याऐवजी कोमट पाणी प्यावं. अन्न खाल्ल्यानंतर व्यायाम करणं टाळावं.

गहू किंवा जवसपासून बनलेले पदार्थ खाल्ल्यानंतरही थंड पाणी पिऊ नये.

अर्धकच्चं किंवा अत्यंत शिजलेलं अन्न खाणं टाळावं. तसेच अन्न कशावर शिजवलं गेलं आहे, यावरही अन्नाची पोषणमूल्ये अवलंबून असतात.

Follow Us
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रफुल पटेल यांची दिल्लीत तासभर चर्चा.
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी
NCP मध्ये पत्राचं वादळ, सुनेत्रा पवारांची पटेल-तटकरेंवर नाराजी.
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.