AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबाच्या पाकळ्यांपासून ते बाटलीपर्यंत, जाणून घ्या पतंजलीचे गुलाब सरबत कसे तयार होते ?

भारतीय बाजारपेठेत सध्या पतंजली आयुर्वेदच्या 'गुलाब सरबता'ची खूप चर्चा आहे. कंपनीचा दावा आहे की, हे सरबत केवळ चव आणि ताजेपणाचे प्रतीक नाही, तर आयुर्वेदिक आरोग्य फायद्यांचाही खजिना आहे. पारंपरिक आयुर्वेदिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम करून, पतंजलीच्या अत्याधुनिक कारखान्यांमध्ये हे सरबत कसे तयार होते, चला जाणून घेऊया.

गुलाबाच्या पाकळ्यांपासून ते बाटलीपर्यंत, जाणून घ्या पतंजलीचे गुलाब सरबत कसे तयार होते ?
patanjali gulab sharbat
| Edited By: | Updated on: Jul 30, 2025 | 10:54 PM
Share

भारतीय बाजारपेठेत ‘पतंजली आयुर्वेद’च्या ‘गुलाब सरबता’ची सध्या खूप चर्चा आहे. कंपनीचा दावा आहे की, हे सरबत केवळ चवदार आणि ताजेतवाने करणारे पेय नाही, तर त्यात आयुर्वेदिक आरोग्याचे अनेक फायदे देखील दडलेले आहेत. पतंजलीच्या अत्याधुनिक कारखान्यांमध्ये हे सरबत पारंपरिक आयुर्वेदिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार केले जाते. हे सरबत नैसर्गिक घटकांपासून बनवले जाते आणि त्यात कोणत्याही कृत्रिम रसायनांचा वापर केला जात नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे. चला, हे सरबत कसे तयार केले जाते आणि त्यासाठी कोणत्या मशीन वापरल्या जातात, हे सविस्तर जाणून घेऊया.

पाकळ्यांपासून अर्क आणि सिरपपर्यंतचा प्रवास:

पतंजलीने दिलेल्या माहितीनुसार, गुलाब सरबताच्या निर्मितीची सुरुवात ताज्या गुलाबाच्या पाकळ्या, गुलाबजल आणि कमी प्रमाणात साखरेने होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून थेट खरेदी केलेल्या जैविक (ऑरगॅनिक) गुलाबाच्या पाकळ्या स्वयंचलित वाॅशींग मशीनमध्ये (Automatic Washing Machines) स्वच्छ केल्या जातात. यानंतर, ‘स्टीम डिस्टिलेशन’ (Steam Distillation) मशीनच्या मदतीने गुलाबाचे पाणी आणि अर्क तयार केला जातो. ही प्रक्रिया पाकळ्यांचे नैसर्गिक गुणधर्म आणि सुगंध सुरक्षित ठेवण्यास मदत करते. त्यानंतर, साखर पाण्यात विरघळवून गरम केली जाते आणि एक घट्टसर सिरप बनवला जातो. या पाकात गुलाबाचा अर्क, गुलाबजल आणि वेलचीसारख्या आयुर्वेदिक औषधी वनस्पती मिसळल्या जातात.

शुद्धता आणि पॅकेजिंगची प्रक्रिया:

तयार झालेले मिश्रण स्टेनलेस स्टीलच्या मोठ्या मिक्सिंग टँकमध्ये एकसमान केले जाते. त्यानंतर, मायक्रोन फिल्टर मशीनमधून (Micron Filter Machines) ते गाळले जाते, ज्यामुळे त्यातील अशुद्धी दूर होतात. काही प्रकरणांमध्ये, सरबताची ‘शेल्फ लाइफ’ (Shelf Life) वाढवण्यासाठी हलके पाश्चुरीकरण (Pasteurization) केले जाते, मात्र पतंजली नैसर्गिकतेवर अधिक भर देते.

तयार झालेले सरबत स्वयंचलित फिलिंग मशीनद्वारे (Automatic Filling Machines) ‘फूड-ग्रेड’ (Food-Grade) बाटल्यांमध्ये भरले जाते. या बाटल्यांना कॅपिंग (Capping) आणि लेबलिंग (Labeling) मशीनने सील करून पॅक केले जाते. ‘कन्व्हेयर सिस्टीम’ (Conveyor System) या संपूर्ण प्रक्रियेला वेगवान आणि कार्यक्षम बनवते. उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी, ‘पीएच मीटर’ (pH Meter) आणि ‘ब्रिक्स मीटर’ (Brix Meter) यांसारख्या उपकरणांनी प्रत्येक बॅचची तपासणी केली जाते.

आरोग्यदायी फायदे आणि जागतिक पोहोच:

पतंजलीचे हे सरबत फक्त भारतातच नाही, तर अमेरिका, युरोप आणि आफ्रिका यांसारख्या जागतिक बाजारपेठांमध्येही निर्यात केले जाते. कंपनीचा ‘मेगा फूड पार्क’ स्थानिक शेतकऱ्यांना सक्षम बनवतो, जे गुलाबाच्या शेतीत योगदान देतात. कंपनीचा दावा आहे की, हे सरबत पचनसंस्थेसाठी, त्वचेसाठी आणि मानसिक शांततेसाठी फायदेशीर मानले जाते. नैसर्गिक घटक आणि गुणवत्तेबद्दलची ही कटिबद्धता पतंजलीला आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये आघाडीवर ठेवते.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.