AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं इंधन संकट अनेक पटींनी वाढण्याची शक्यता, इराण देणार मोठा धक्का? मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी

अमेरिका इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा आज 16 वा दिवस आहे. 16 व्या दिवशी भारताची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे, त्यामुळे भारतामधील इंधन संकट आता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

भारताचं इंधन संकट अनेक पटींनी वाढण्याची शक्यता, इराण देणार मोठा धक्का? मध्य पूर्वेतून सर्वात मोठी बातमी
FuelImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 10:17 PM
Share

अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 16 दिवस असून, मध्य पूर्वेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने होर्मूज स्ट्रेट बंद केला आहे. होर्मजू स्ट्रेट बंद झाल्यामुळे संपूर्ण जग सध्या मोठ्या इंधन संकटात सापडलं आहे. जगाला जेवढ्या कच्च्या तेलाची गरज लागते, त्यातील सुमारे 25 टक्के कच्च्या तेलाची वाहतूक या एकट्या सामुद्रधुनीमधून होते. दरम्यान त्यानंतर आता आणखी एक टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे यमनच्या हुती बंडखोरांनी इराणच्या समर्थनार्थ बाब अल-मंडेब सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा दिला आहे. ही सामुद्रधुनी कोणत्याही वेळी आता हुती बंडखोरांकडून बंद करण्यात येऊ शकते. याबाबत बोलताना एका हुती बंडखोरांच्या वरिष्ठ कमांडरने म्हटलं आहे की, जर अमेरिका आणि इस्त्रायकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांविरोधात आम्ही इराणची मदत करण्याचा निर्णय घेतला तर आमच्याकडे बाब अल-मंडेब स्ट्रेट बंद करणे हा मुख्य पर्याय असणार आहे. यामुळे आता भारताचं देखील टेन्शन वाढणार आहे.

बाब अल-मंडेब मार्ग भारतासाठी किती महत्त्वाचा

अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर हल्ले सुरू आहेत, या पार्श्वभूमीवर इराणने होर्मुज स्ट्रेट यापूर्वीच बंद केला आहे. अशा परिस्थितीमध्ये जर हुती बंडखोरांनी बाब अल -मंडेब स्ट्रेट बंद केला तर भारताची समस्या अनेक पटींनी वाढू शकते. भारत या दोन मार्गाने मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आणि गॅसची आयात करतो. अशा परिस्थितीमध्ये जरा वाहतुकीसाठी हे दोन्ही रस्ते बंद झाले तर भारतासमोर इंधन तुटवड्याचं मोठं संकट निर्माण होऊ शकतं. युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुज स्ट्रेट तर आधीपासूनच बंद आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्यानं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा संकट निर्माण झालं आहे, आणि आता जर हुती बंडखोरांनी बाब अल-मंडेब सामुद्रधुनी बंद केली तर भारतासमोर असलेलं ऊर्जा संकट दुप्पट होण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढू शकतात. गॅसचा देखील तुटवडा निर्माण होऊ शकतो.

जगातील एकूण व्यापारापैकी जवळपास 12 टक्के आयात, निर्यात या मार्गाने होते. त्यामुळे हा मार्ग केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा आहे. जर हा मार्ग हुती बंडखोरांनी बंद केला तर संपूर्ण जगच मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. दरम्यान इराणच्या एका इशाऱ्यावर आता हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.

Follow Us
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून....
पुण्यात आणखी एका वैष्णवीने जीवन संपवलं; सासरच्या जाचाला कंटाळून.....
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया.
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?
पदवी घ्यावी की नको, कारण मानद पदवी मिळाल्यानंतर फडणवीस असं का म्हणाले?.
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं
महापौरांच्या गाडीवर लाल दिव्यावरून राजकारण तापलं.
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
बारामती, राहुरी पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान.