AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ब्रेन स्ट्रोक’ची लक्षणे दिसताच काळजी घ्या, उशीर झाल्यास जीवावर बेतेल!

साधारणत: स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत. पहिला ‘ब्लड क्लॉट स्ट्रोक’ आणि दुसरा ‘ब्रेन हॅमरेज’. स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे तीव्र डोकेदुखी. रुग्णाला नीट बोलता येत नाही. त्याची जीभेची बोबडी वळते. शरीर सुन्न होउन जाते.

‘ब्रेन स्ट्रोक’ची लक्षणे दिसताच काळजी घ्या, उशीर झाल्यास जीवावर बेतेल!
‘या’ आजाराने त्रस्त असल्याने, ब्रूस विलिस यांनी स्विकारली निवृत्तीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Feb 24, 2022 | 12:26 PM
Share

मुंबई : देशात काही वर्षांपासून ब्रेन स्ट्रोकचा (Brain Stroke) धोका वाढताना दिसत आहेत. लोकांना या आजाराबद्दल तसेच यातील लक्षणांची (symptoms) योग्य माहिती नसते. शिवाय अनेकदा डोकेदुखी तसेच इतर लक्षणांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात असते. जागृतीचा अभाव आणि रुग्णालयात पोहोचण्यास उशीर यामुळे मृत्यूचे प्रमाण (Death rate) वाढत आहे. शरीरात स्ट्रोकची लक्षणे दिसू लागताच तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. यासाठी लोकांमध्ये या आजाराबाबत जागरुकता असणे गरजेचे आहे. देशात दरवर्षी 18 लाख लोकांना ‘ब्रेन स्ट्रोक’चा त्रास होतो. त्यातून सुमारे 30 टक्के लोकांचा मृत्यू होतो. ब्रेन स्ट्रोकचा आजार काय आहे, त्याची लक्षणे काय आहेत आणि ते कसे टाळता येईल याबाबत या लेखात जाणून घेणार आहोत.

एम्सच्या सेंटर फॉर न्यूरोसायन्सेसचे प्रमुख प्राध्यापक असलेले एम.व्ही. श्रीवास्तव यांच्या मते, डोक्याच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा योग्य न झाल्यास मेंदूचा झटका येतो. शरीरातील ऑक्सिजन आणि रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे मेंदूतील नसा कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे पक्षाघातही होतो. स्ट्रोकचे दोन प्रकार आहेत. पहिला ‘ब्लड क्लॉट स्ट्रोक’ आणि दुसरा ‘ब्रेन हॅमरेज’आहे. स्ट्रोकच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे तीव्र डोकेदुखी. रुग्णाला नीट बोलता येत नाही. शरीर किंवा हात पाय सुन्न होऊ लागतात.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास उशीर न करता तातडीने जवळच्या रुग्णालयात जावे. कारण स्ट्रोक झाल्यास लवकर उपचार मिळणे अत्यंत गरजेचे असते. विलंबाने रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. स्ट्रोकच्या बाबतीत पहिले तीन ते चार तास खूप महत्त्वाचे असतात. मात्र बहुतांश रुग्ण उशिराने रुग्णालयात पोहोचल्याचे दिसून येते, त्यामुळे त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या व्यक्तींना सर्वाधिक धोका

वरिष्ठ फिजिशियन डॉ. कमलजीतसिंग कैंथ यांच्या मते, ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह आहे आणि जे लोक जास्त प्रमाणात दारू आणि सिगारेटचे सेवन करतात. त्यांना पक्षाघाताचा धोका जास्त असतो. म्हणूनच जे लोक भरपूर दारू पितात त्यांनी त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, शक्य असल्यास दारू पूर्णपणे सोडून देणे उत्तम. सिगारेट ओढणाऱ्यांनाही पक्षाघाताचा सर्वाधिक धोका असतो. तसेच ज्या लोकांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. त्यांनी स्वत:ची नियमित तपासणी करत राहावी, तसेच सकस आहार व नियमित व्यायाम करावा

असा टाळा धोका!

1) दररोज व्यायाम करा.

2) प्रदूषित वातावरणापासून दूर राहा.

3) नेहमी ताजा व सकस आहार घ्या.

4) ‘स्ट्रोक’ची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

संबंधित बातम्या

वंध्यत्वाची समस्या? हा ओटीपोटाचा क्षयरोग तर नाही… ही आहेत लक्षणे

Yoga Poses : चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी ‘हे’ 5 योगासन नियमित करा!

मळमळ, मूड स्विंग आणि बरंच काही, गरोदरपणातील समस्यांवर सात घरगुती उपाय

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.