AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Side Effects of Coconut Water: प्रत्येकासाठी फायदेशीर नसते नारळपाणी, ‘या’ लोकांना होऊ शकतो त्रास

नारळ पाण्याचे सेवन केल्याने ब्लड प्रेशर कमी होऊ शकते. ज्या लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर नारळ पाणी प्यावे.

Side Effects of Coconut Water: प्रत्येकासाठी फायदेशीर नसते नारळपाणी, 'या' लोकांना होऊ शकतो त्रास
प्रत्येकासाठी फायदेशीर नसते नारळपाणी, 'या' लोकांना होऊ शकतो त्रासImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2022 | 4:18 PM
Share

नवी दिल्ली: सुपर फूड कॅटॅगरीत असलेले नारळाचे अथवा शहाळ्याचे पाणी (Coconut Water) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर (beneficial for health) असते. मात्र काही लोक असे असतात ज्यांना नारळाचे पाणी प्यायल्याने त्रास होऊ शकतो. नारळ पाण्यामध्ये पोटॅशिअम (potassium), सोडिअम आणि मॅग्नेशिअम सारखे कार्बोहायड्रेट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स मुबलक प्रमाणात असतात, जे शरीर हायड्रेट करण्यासाठी व इलेक्ट्रोलाइट संरचना उत्तम बनवण्यासाठी उपयोगी ठरतात. मात्र असे असले तरी नारळ पाणी सर्वांसाठीच फायदेशीर ठरते असे नाही, असे मत काही तज्ज्ञांनी नोंदवले आहे. वेबएमडीनुसार, ज्या व्यक्तींना ब्लड प्रेशरचा (blood pressure) त्रास आहे किंवा पोटॅशिअमची समस्या आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच नारळ पाणी प्यावे.

नारळ पाणी प्यायल्याने कोणत्या व्यक्तींना होऊ शकतो त्रास?

इलेक्ट्रोलाइट असंतुलन

ज्या लोकांना पोटॅशिअमची समस्या जास्त आहे, त्यांच्या शरीरात नारळपाणी पिण्यामुळे इलेक्ट्रोलाइट असंतुलन होऊ शकते. खरंतर, नारळाच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण इलेक्ट्रोलाइट्सपेक्षा जास्त असते, म्हणून जर त्याचे जास्त सेवन केले तर पोटॅशिअमची पातळी वेगाने वाढू शकते. आणि अर्धांगवायूचा (पॅरॅलिसिस) धोका वाढू शकतो.

ब्लड प्रेशर कमी होऊ शकते

नारळाच्या पाण्याच्या सेवनाने रक्तदाब कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत ज्या लोकांना लो ब्लडप्रेशरचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच नारळाच्या पाण्याचे सेवन करावे.

वजन वाढते

नारळाच्या पाण्यात जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे नारळाच्या पाण्याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीरातील कॅलरीज वाढतील आणि तुमचे वजनही वाढेल.

सिस्टिक फायब्रोसिस

सिस्टिक फायब्रोसिस ही एक अनुवांशिक समस्या असते, ज्यामध्ये शरीरातील मीठाची पातळी कमी होते. नारळाच्या पाण्यात सोडिअम खूप कमी आणि पोटॅशिअम खूप जास्त असते. अशावेळी सिस्टिक फायब्रोसिस झाला असेल तर मिठाची पातळी वाढवण्यासाठी नारळाचे पाणी पिऊ नये.

किडनीचा आजार

नारळ पाण्यात पोटॅशिअम खूप जास्त असते, ज्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला आधीच किडनीचा काही त्रास अथवा आजार असेल तर आपल्या डॉक्टरांना सांगूनच किंवा त्यांच्या सल्ल्यानेच नारळाच्या पाण्याचे सेवन करा.

शस्त्रक्रिया

जर तुमची एखादी शस्त्रक्रिया (surgery)झाली असेल किंवा शस्त्रक्रिया होणार असेल तर त्याआधी किंवा नंतर रक्तदाब संतुलित असणे महत्वाचे आहे. नारळाचे पाणी प्यायल्याने आपला रक्तदाब कमी करू होऊ शकते. त्यामुळे शस्त्रक्रिया होण्याच्या किंवा झाल्यानंतरच्या काळात नारळाच्या पाण्याचे सेवन करू नका.

Follow Us
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...
विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय
tv9 Marathi Special Report | विधान परिषदेआधी पवारांच्या गोटात भूकंप; 3 आमदारांनी घेतला मोठा निर्णय! राजकारणातील सर्वात मोठा ट्विस्ट
राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार?
Nana Patole On NCP Merger | राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन होणार? नाना पटोलेंच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!