AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करायचंय? मग प्या हे ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी

Weightloss Drinks: वजन जितक्या वेगाने वाढते तितके कमी होत नाही. पंतप्रधान मोदींनी आता लठ्ठपणाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. तज्ञांच्या मते पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज काही आरोग्यदायी पेये पिऊ शकता.

वजन कमी करायचंय? मग प्या हे  ड्रिंक्स; महिन्याभरात वजन कमी
| Edited By: | Updated on: Feb 25, 2025 | 10:05 PM
Share

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि चुकिच्या खाण्या पिण्याच्या सवयींमुळे जगभरात लठ्ठपणाच्या समस्या वाढल्या आहेत. लठ्ठपणामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो आणि तुम्हाला अनेक आरोग्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. भारतामध्ये कमी वयामध्ये अनेक मुलं लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहे. लठ्ठपणा वाढल्यामुळे तुम्हाला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल सारख्या समस्या होऊ शकतात. भरातात लठ्ठपणाच्या समस्या टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लठ्ठपणाविरुद्ध मोहीमही सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पंतप्रधान मोदी यांनी मनु भाकर, ओमर अब्दुल्ला आणि आर माधवन यांची भेट घेतली. लठ्ठपणा विरूद्ध लढाईसाठी माधवनसह 10 जणांना नामंकन देण्यात आले आहे.

एवढेच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमच्या जेवणामध्ये कमीत कमी तेलाचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. जेवणामध्ये तेलाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे तुम्हाला आरोग्यासंबंधित अनेक समस्या होऊ शकतात. तज्ञांच्या मते, तुमच्या पोटातील चरबी वाढल्यामुळे लठ्ठपणा येतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, शरीरातील चयापचय वाढवणारे अनेक पेये आहेत. या पेयांचे सेवन केल्यास चरबी वितळते. चला तर मग जाणून घेऊया लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोणते पेय फायदेशीर ठरतात.

आवळा रस – आवळ्याच्या रसात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील चयापचय वाढवते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. आवळ्याचा रस प्यायल्याने तुमची त्वचा निरोगी राहते आणि वजन कमी होण्यास मदत होते. यामुळे चरबी जाळण्याची प्रक्रिया वेगाने वाढते.

जिरे पाणी – पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी जिरे पाणी खूप फायदेशीर आहे. जिरे पाणी शरीरातील चरबी जाळण्यास मदत करते आणि पोटाच्या समस्या देखील दूर करते. यासाठी, रात्रभर पाण्यात एक चमचा जिरे भिजवा, नंतर सकाळी ते उकळवा, पाणी गाळून प्या.

ग्रीन टी- ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असते ज्यामुळे शरीरातील चरबी वितळण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी आणि लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही रात्री जेवणाच्या अर्धा तासानंतर ग्रीन टी पिऊ शकता. यामुळे चयापचय मजबूत होतो.

बडीशेप पाणी – एका ग्लास पाण्यात एक चमचा बडीशेप घाला आणि ते पाणी उकळा. पाणी चांगले उकळल्यानंतर थंड झाल्यावर प्या. तज्ञ म्हणतात की बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. याशिवाय, बडीशेपचे पाणी शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी या गोष्टी करा…

सकाळी उठल्यावर कोमट पाण्यामध्ये मध मिसळून प्या. सकाळी नियमित व्यायाम आणि योगा केल्यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते. तुमच्या जेवणामध्ये फॅट्स असलेल्या पदार्थाचं सेवन करणं टाळा त्याऐवजी प्रोटिनची मात्रा वापरा. वजन कमी करण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्या. वजन कमी करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 2-3 तास जेवण करा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.