AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज दोन अंजीर खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ञाकडून

अंजीर पोषक तत्वांनी समृद्ध असून शरीराला असंख्य फायदे देतात. पण चला, एका तज्ञाकडून जाणून घेऊया की दररोज दोन अंजीर खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो.

दररोज दोन अंजीर खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? जाणून घ्या तज्ञाकडून
anjeerImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 3:06 PM
Share

आजच्या स्पर्धच्या जीवनात लोकं त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्याचा पर्यंत करतात. परंतु नेहमी छोट्या-छोट्या पदार्थांचा आरोग्यावर किती महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतो हे समजण्यास बहुतेकजण अनेकदा कमी पडतात. अशातच ड्रायफ्रूट्स मधील असलेले अंजीर, एक सुके फळ असून आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र या दोन्हीमध्ये अत्यंत फायदेशीर मानले जाणारे एक सुपरफूड आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या रोजच्या आहारात फक्त दोन अंजीर समावेश केल्याने शरीर मजबूत होण्यास, पचनक्रिया सुधारण्यास आणि अनेक लहान-मोठ्या समस्यांपासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते.

परंतु रोजच्या धावपळीत बरेच लोकं अंजीरचे सेवन करणे टाळतात. पण तुम्ही दररोज दोन अंजीर खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात, हे आपण तज्ञांकडून जाणून घेऊया. इतकेच नाही, तर कोणी आणि कोणत्या प्रमाणात त्यांचे सेवन करावे हे देखील जाणून घेऊयात.

पोषक तत्वांनी समृद्ध अंजीर

तज्ञांच्या मते अंजीरमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केवळ पोट स्वच्छ ठेवण्यासच नव्हे तर रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासही मदत करतात. त्यांचे दररोज सेवन केल्याने अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो. चला रोज दोन अंजीर खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

फोर्टिस हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (पचनसंस्थेचे तज्ञ) तज्ञांनी नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी अंजीर खाण्याचे प्रचंड फायदे अधोरेखित केले आहेत. डॉ. सांगतात की लोकं अनेकदा अंजीरकडे दुर्लक्ष करतात. तर रोजच्या धावपळीतून फक्त दोन अंजीर खाल्ल्याने केवळ बद्धकोष्ठतेपासून आराम मिळत नाही, तर संपूर्ण आरोग्यालाही अनेक फायदे होतात.

रोज दोन अंजीर खाल्ल्यास हे आरोग्यदायी फायदे होतात

तज्ञांच्या मते, अंजीरमध्ये सॉल्यूबल आणि इंसोल्यूबल फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे अंजीरचे सेवन केल्याने शौचास लवकर होण्यास आणि शौच मऊ होण्यास मदत होते. दररोज सकाळी भिजवलेले अंजीर खाल्ल्याने पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.

हाडे मजबूत करते – अंजीर हे लोह आणि कॅल्शियमचा देखील एक उत्कृष्ट स्रोत आहे. तज्ञांच्या मते,100 ग्रॅम अंजीरमध्ये अंदाजे 162 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडांची घनता वाढवण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. दररोज दोन अंजीर खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. शिवाय, त्यातील लोहाच्या प्रमाणामुळे चयापचय क्रिया सुधारते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

रक्तातील साखर नियंत्रित करा – अंजीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यांसारखी आवश्यक पोषक तत्वे असतात. रोज अंजिरचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि हृदयाचे आरोग्यही सुधारते. त्यामुळे जर तुम्हाला उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास असेल तर अंजीर खाणे फायदेशीर ठरू शकते. एकंदरीत अंजीर हे एक सुपरफूड आहे. आहारात अंजीरचा नक्की समावेश करा. तथापि काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

या गोष्टी लक्षात ठेवा

अंजीरचे स्वभाव खूप उष्ण असतात. त्यामुळे, ते खाण्यापूर्वी नेहमी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. यामुळे त्यांची शक्ती वाढते आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळता येतात. तथापि अंजीर खाण्याच्या प्रमाणाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. तज्ञांच्या मते, दररोज 2 ते 3 अंजीर खाणे पुरेसे आहे. उन्हाळ्यात मात्र फक्त एक अंजीर खाणे फायदेशीर ठरते. तथापि जर तुम्हाला अंजीराचे पूर्ण फायदे हवे असतील, तर ते दररोज खावेत.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.) —————————————————————— —————————————————————— ——————————————————————

Follow Us
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय
शहरातही आता चुलींना मागणी वाढली, गॅस सिलिंडर टंचाईवर शोधला उपाय.
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट..
खरातवर आणखी दोन गुन्हे दाखल, एकूण गुन्ह्यांची संख्या १०, हवाला रॅकेट...
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?
रुपाली चाकणकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार ? काय म्हणाल्या अंधारे?.
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका
'ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित नाहीत ते...', राऊत यांची मोदींवर टीका.
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.