AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळचा चहा 10 दिवस बंद केला तर काय होईल? गणित एकदा समजून घ्या

चहा आणि कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण जर तुम्ही चहा-कॉफी पिणे अचानक सोडून दिले, तर पहिल्या १० दिवसांत तुमच्या शरीरात कोणते सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडतात? जाणून घ्या सविस्तर.

सकाळचा चहा 10 दिवस बंद केला तर काय होईल? गणित एकदा समजून घ्या
tea coffee
| Updated on: May 26, 2026 | 12:35 PM
Share

प्रत्येक भारतीय घरात चहा किंवा कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होणे हे निव्वळ अशक्य असते. दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी सकाळी गरम चहाचा किंवा कॉफीचा कप हवाच असतो. मर्यादित प्रमाणात चहा-कॉफी घेणे हानिकारक नाही, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. चहा आणि कॉफीमधील कॅफीनच्या अतिसेवनाचा थेट परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होतो. पण जर तुम्ही ही सवय अचानक सोडून दिली, तर पहिल्या १० दिवसांत तुमच्या शरीरात कोणते सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडतात? याबद्दल जाणून घेऊया.

सुरुवातीच्या काही दिवसांतील लक्षणे (पहिले २४ ते ४८ तास)

चहा-कॉफी सोडल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत शरीरात कॅफीन न मिळाल्यामुळे काही तात्पुरती लक्षणे दिसू लागतात. कॅफीनमुळे मेंदूतील रक्तवाहिन्या आकुंचन पावलेल्या असतात. चहा-कॉफी बंद केल्यावर या वाहिन्या अचानक रुंद होतात, ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते आणि प्रचंड थकवा जाणवतो. शरीराला अचानक ऊर्जा न मिळाल्यामुळे कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होते, मरगळ येते आणि चिडचिड वाढते.

१० दिवसांनी काय होते?

मात्र या १० दिवसांनंतर शरीरात ५ मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काही दिवसांचा त्रास सहन केल्यानंतर, १० दिवसांच्या आत शरीर पूर्णपणे ‘कॅफीनमुक्त’ होते आणि त्याचे अप्रतिम फायदे दिसू लागतात. कॅफीन आपल्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात (Sleep Cycle) अडथळा आणते. चहा-कॉफी सोडल्यामुळे शरीराला रात्रीची गाढ झोप मिळते. तसेच सकाळी उठल्यावर कमालीचे ताजेतवाने वाटते. कॅफीनमुळे पोटात ॲसिडिटी, गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. चहा-कॉफी बंद केल्याने पचनसंस्था शांत होते आणि पोटाचे विकार कमी होतात.

कॅफीन शरीरातील ‘कॉर्टिसोल’ (तणाव संप्रेरक) पातळी वाढवते. ते सोडल्यामुळे मानसिक अस्वस्थता कमी होऊन मन शांत होते. सुरुवातीचा थकवा दूर झाल्यावर, दहाव्या दिवसापर्यंत शरीर स्वतःची नैसर्गिक ऊर्जा निर्माण करू लागते. त्यामुळे तुम्हाला ऊर्जेसाठी कोणत्याही बाह्य पेयाची गरज भासत नाही. आपण चहा-कॉफीसोबत मोठ्या प्रमाणात साखर पोटात ढकलत असतो. हे दोन्ही बंद केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होते.

थोडक्यात काय तर… चहा-कॉफी सोडण्याचे सुरुवातीचे २-३ दिवस कठीण असू शकतात, पण त्यानंतर मिळणारे आरोग्यदायी फायदे तुमच्या शरीराला दीर्घायुष्य आणि खरी नैसर्गिक ऊर्जा देतात!

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक