AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळचा चहा 10 दिवस बंद केला तर काय होईल? गणित एकदा समजून घ्या

चहा आणि कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. पण जर तुम्ही चहा-कॉफी पिणे अचानक सोडून दिले, तर पहिल्या १० दिवसांत तुमच्या शरीरात कोणते सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडतात? जाणून घ्या सविस्तर.

सकाळचा चहा 10 दिवस बंद केला तर काय होईल? गणित एकदा समजून घ्या
tea coffee
| Updated on: May 26, 2026 | 12:35 PM
Share

प्रत्येक भारतीय घरात चहा किंवा कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होणे हे निव्वळ अशक्य असते. दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही राहण्यासाठी सकाळी गरम चहाचा किंवा कॉफीचा कप हवाच असतो. मर्यादित प्रमाणात चहा-कॉफी घेणे हानिकारक नाही, पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. चहा आणि कॉफीमधील कॅफीनच्या अतिसेवनाचा थेट परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर होतो. पण जर तुम्ही ही सवय अचानक सोडून दिली, तर पहिल्या १० दिवसांत तुमच्या शरीरात कोणते सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडतात? याबद्दल जाणून घेऊया.

सुरुवातीच्या काही दिवसांतील लक्षणे (पहिले २४ ते ४८ तास)

चहा-कॉफी सोडल्यानंतर पहिल्या दोन दिवसांत शरीरात कॅफीन न मिळाल्यामुळे काही तात्पुरती लक्षणे दिसू लागतात. कॅफीनमुळे मेंदूतील रक्तवाहिन्या आकुंचन पावलेल्या असतात. चहा-कॉफी बंद केल्यावर या वाहिन्या अचानक रुंद होतात, ज्यामुळे डोकेदुखी सुरू होते आणि प्रचंड थकवा जाणवतो. शरीराला अचानक ऊर्जा न मिळाल्यामुळे कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होते, मरगळ येते आणि चिडचिड वाढते.

१० दिवसांनी काय होते?

मात्र या १० दिवसांनंतर शरीरात ५ मोठे सकारात्मक बदल पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काही दिवसांचा त्रास सहन केल्यानंतर, १० दिवसांच्या आत शरीर पूर्णपणे ‘कॅफीनमुक्त’ होते आणि त्याचे अप्रतिम फायदे दिसू लागतात. कॅफीन आपल्या नैसर्गिक झोपेच्या चक्रात (Sleep Cycle) अडथळा आणते. चहा-कॉफी सोडल्यामुळे शरीराला रात्रीची गाढ झोप मिळते. तसेच सकाळी उठल्यावर कमालीचे ताजेतवाने वाटते. कॅफीनमुळे पोटात ॲसिडिटी, गॅस आणि छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. चहा-कॉफी बंद केल्याने पचनसंस्था शांत होते आणि पोटाचे विकार कमी होतात.

कॅफीन शरीरातील ‘कॉर्टिसोल’ (तणाव संप्रेरक) पातळी वाढवते. ते सोडल्यामुळे मानसिक अस्वस्थता कमी होऊन मन शांत होते. सुरुवातीचा थकवा दूर झाल्यावर, दहाव्या दिवसापर्यंत शरीर स्वतःची नैसर्गिक ऊर्जा निर्माण करू लागते. त्यामुळे तुम्हाला ऊर्जेसाठी कोणत्याही बाह्य पेयाची गरज भासत नाही. आपण चहा-कॉफीसोबत मोठ्या प्रमाणात साखर पोटात ढकलत असतो. हे दोन्ही बंद केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात राहण्यास मोठी मदत होते.

थोडक्यात काय तर… चहा-कॉफी सोडण्याचे सुरुवातीचे २-३ दिवस कठीण असू शकतात, पण त्यानंतर मिळणारे आरोग्यदायी फायदे तुमच्या शरीराला दीर्घायुष्य आणि खरी नैसर्गिक ऊर्जा देतात!

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच...
एक, दोन नाही तब्बल 3000 गॅस सिलिंडर गेले वाहून, पूराच्या प्रावाहतच... पहा व्हिडीओ
ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
Video | ममता बॅनर्जींचा पारा चढला, कार्यकर्त्याला चक्क कानशीलात लगावली, थेट...
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक,
एकनाथ शिंदेंच्या दालनातच राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या आमदारांची बैठक, रोहित पवार अनुपस्थित तर...नेमकं काय घडलं?
रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
Rohit Pawar | केडीएमसी रुग्णालयातील मारहाण प्रकरण; रोहित पवार, विनायक राऊत यांनी घेतली जखमी डॉक्टरांची भेट
जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
Jalgaon | जळगावला पावसाचा जबरदस्त तडाखा! चाळीसगाव-पाचोरा जलमय; वाहतुकीवर परिणाम
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवार
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक; शरद पवारांचीही उपस्थिती, बैठकीत...
एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
मोठी बातमी! एका क्षणात इमारत जमीनदोस्त! 14 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, पुण्यात खळबळ
बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही
Akola | बोगस बियाण्यांनी घात केला! शेतात अंकुरच फुटला नाही; हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक!
कुठे धो-धो पाऊस तर कुठे महापूर, मात्र राज्यातील हा जिल्हा कोरडा ठाक! पाण्याच्या थेंबाथेंबासाठी...
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच एकनाथ शिंदेंचा कामाचा धडाका, ठाण्यातील आपत्ती निवारण कक्षाला भेट