AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Acidity: ॲसिडिटी का होते ? जाणून घ्या लक्षणे व उपचार

आपल्यापैकी बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा त्रास होतो. त्याची लक्षणे जाणून घेऊन वेळीच उपचार केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.

Acidity: ॲसिडिटी का होते ? जाणून घ्या लक्षणे व उपचार
| Updated on: Nov 16, 2022 | 2:46 PM
Share

नवी दिल्ली – जेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ग्लँड ही ॲसिडचे उत्पादन वाढवू लागते, त्या स्थितीला ॲसिडिटी (acidity)असे म्हणतात. सामान्यत: आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्त्राव होतो, जो अन्न पचवण्याचे व ते तोडण्याचे कार्य करतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो तेव्हा शरीरात अपचन, छातीत जळजळ होणे, अन्ननलिकेत वेदना होणे, पोटात अल्सर आणि जळजळ (burning sensation) होणे अशी लक्षणे दिसून येतात. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि खराब जीवनशैली (bad lifestyle) यामुळे ॲसिडिटी होते. त्याशिवाय जे लोक जास्त प्रमाणात मांसाहार करणाऱ्या किंवा अति तेलकट व तिखट पदार्थ खाणाऱ्यानाही ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. काही औषधांनी ॲसिडिटीचा कमी होऊ शकतो, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत.

ज्या लोकांना ॲसिडिटीची समस्या असते त्यांना अन्ननलिकेत वेदना होणे तसेच जेवल्यानंतर पोटात जळजळ होणे आणि आंबट ढेकर येणे अशी लक्षणे जाणवतात. तर काही वेळा त्यांना बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास देखील होतो. जीवनशैलीत बदल करणे व खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे या उपायांनी ॲसिडिटीवर उपचार करता येऊ शकतात. काही घरगुती उपायांनीही ॲसिडिटीचा त्रास कमी करता येऊ शकतो.

काय आहेत ॲसिडिटीची लक्षणे ?

– पोटात जळजळ होणे

– घशात जळजळणे

– अस्वस्थ वाटणे

– आंबट ढेकर येत राहणे

– तोंडाची चव जाणे

– बद्धोष्ठतेचा त्रास होणे.

कशामुळे होतो ॲसिडिटी ?

1) सतत मांसाहार व तेलकट, तिखट पदार्थ खाणे

2) धूम्रपान व मद्यपान करणे

3) ताणतणाव

4) पोटाचे आजार

कसा करावा ॲसिडिटीपासून बचाव ?

– मसालेदार अन्नपदार्थ खाणे टाळावे.

– आहारात जास्तीत जास्त भाज्या व फळांचा समावेश करावा.

– भरपूर पाणी व द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवावे.

– अन्न चावून चावून सावकाश खावे.

– जेवणानंतर लगेच झोपू नये. जेवण व झोप यात कमीत कमी 3 तासांचे अंतर ठेवावे.

– तुळशीची पाने, लवंग, बडीशोप इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

– गरज नसताना औषधे घेणे टाळावे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.