AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या देशांवर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरच मोठा हल्ला, 4 रेंजर्सचा मृत्यू

कराचीतील आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी जमात-उल-अहरारने स्वीकारली आहे. या घटनेत चार पाकिस्तानी रेंजर्स शहीद झाले, तर प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात पाच दहशतवादी ठार झाले.

दुसऱ्या देशांवर दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानवरच मोठा हल्ला, 4 रेंजर्सचा मृत्यू
Karachi AttackImage Credit source: Social Media
| Updated on: Jun 28, 2026 | 8:19 AM
Share

भारतामध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानच्या कराची शहरात शनिवारी रात्री मोठा आत्मघाती हल्ला झाला. समोर आलेल्या माहितीनुसार कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर परिसरातील युनिव्हर्सिटी रोडजवळ अचानक जोरदार आवाजासह स्फोट झाले. यावेळी धाडधाड गोळीबारही सुरु होता. घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली. स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या हल्ल्यात चार पाकिस्तानी रेंजर्सचा मृत्यू झाला आहे. तर प्रत्युत्तर कारवाईत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. या आत्मघाती हल्ल्याची जबाबदारी ‘जमात-उल-अहरार’ या संघटनेने घेतली आहे. हा एक मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

हल्ल्याचे नियोजन कसे करण्यात आले?

सांगण्यात येत आहे की, कराचीमध्ये आत्मघाती हल्ल्याचे नियोजन अत्यंत सुव्यवस्थित पद्धतीने करण्यात आले होते. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेल्या वाहनाला थेट सिंध रेंजर्स मुख्यालयाच्या मुख्य गेटला धडक दिली आणि लगेच गोळीबार सुरू केला. यामुळे कोणालाच काही समजले नाही आणि दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात चार रेंजर्सचा जागीच मृत्यू झाला. मात्र नंतर प्रत्युत्तर कारवाईत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. हल्ल्याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलिस आणि सुरक्षा दलाचे जवान घटनास्थळी पाठवण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली.

९० मिनिटे चालली चकमक

हल्ला रात्री सुमारे ८ वाजून ३० मिनिटांनी झाला. जेव्हा स्फोटकांनी भरलेली गाडी सिंध रेंजर्सच्या पॅरामिलिटरी मुख्यालयाच्या मुख्य गेटला धडकली. यामुळे मोठा स्फोट झाला. दहशतवादी गाडीतून मुख्य गेट तोडून थेट परिसरात घुसले आणि गोळीबार सुरू केला. यावेळी सातत्याने ग्रेनेड हल्लाही करण्यात आला. यामुळे परिसरात अनेक स्फोट झाले. घटनेची माहिती मिळताच कराची पोलिसांनी मोर्चा सांभाळला आणि दोन्ही बाजूंकडून सुमारे ९० मिनिटे गोळीबार चालला. यात विशेष सुरक्षा युनिट, अँटी टेररिस्ट फोर्स आणि घटनास्थळी उपस्थित रेंजर्स यांनी दहशतवाद्यांवर नियंत्रण आणले. या कारवाईत पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे.

जमात-उल-अहरारने घेतली जबाबदारी

सूत्रांच्या मते, कराचीतील या हल्ल्याची जबाबदारी प्रतिबंधित तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी संबंधित जमात-उल-अहरार या संघटनेने घेतली आहे. ही संघटना पाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या सीमेलगत खैबर पख्तूनख्वा प्रांतात सक्रिय मानली जाते. याने यापूर्वीही अनेक हल्ले केले आहेत. जमात-उल-अहरारने दावा केला आहे की या हल्ल्यात ९ दहशतवादी सहभागी होते. मात्र पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी याची अद्याप पुष्टी केलेली नाही. घटनेच्या नंतर परिसरात सुरक्षा एजन्सींकडून शोध मोहीम सुरू आहे. कराची पोलिस देखील तपासात गुंतले आहेत.

कराचीत शोध मोहीम सुरू

कराची आत्मघाती हल्ल्यानंतर शहरात शोध मोहीम सुरू आहे. सुरक्षा दलांनी गुलिस्तान-ए-जौहर आणि युनिव्हर्सिटी रोड परिसर रात्रीच सील केला होता. लोकांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. सिंधचे मुख्यमंत्री आणि पोलिस महानिरीक्षक यांनी या आत्मघाती हल्ल्याचा पूर्ण अहवाल मागितला आहे. घटनेनंतर पोलिस सतर्क दिसत आहेत.

Follow Us
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत...
संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; 'शिवतीर्था'वरील बैठकीत... नेमकं काय घडलं?
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकली...
आम्ही भारतीयच, आम्हाला चायनीज नका म्हणू; अरुणाचल प्रदेशमधील चिमुकलीचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी बैठक
दिल्लीत हालचाली वाढल्या! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली तिसरी उच्चस्तरीय बैठक, देशाच्या प्रशासकीय यंत्रणेला...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट...
महाराष्ट्रातील सहकारी बँकांचं अस्तित्त्वच... बड्या नेत्याचा थेट अमित शहांवर हल्लाबोल, गुजरातमधील...
ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय...
Devendra Fadnavis | ठाकरे गटातील नेत्याकडून देवेंद्र फडणवीसांचं तोंडभर कौतुक, नेमकं काय घडलं?
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं फडणवीसांना पत्र
राजकीय हालचालींना वेग! ठाकरे गटातील अंबादास दानवेंचं थेट CM फडणवीसांना पत्र, अचानक...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय...
महायुतीत मिठाचा खडा! विकासनिधीवरून बिनसलं; पुण्यातील राजकारणात काय काय घडतंय?
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड