AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा, भारताने रशियाकडून तेल खरेदी केले नसते तर…

आता नुकताच एका रिपोर्टमध्ये मोठा खुलासा करण्यात आलाय. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्याने जगावरील मोठे संकट टळले आहे. मात्र, अमेरिकेकडून भारतावर सातत्याने अत्यंत गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर त्यांनी भारतावर मोठा टॅरिफ देखील लावला आहे.

भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा, भारताने रशियाकडून तेल खरेदी केले नसते तर...
India and Russia
| Updated on: Aug 30, 2025 | 3:15 PM
Share

अमेरिकेने भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्याने सांगितले जात आहे की, रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने आम्ही टॅरिफ लावलाय. त्यांनी तेल खरेदी करणे बंद करावे, आम्ही 25 टक्के टॅरिफ कमी करू. युक्रेन संघर्ष हे मोदी युद्ध असल्याचेही अमेरिकेने म्हटले. आता नुकताच याबाबत मोठा अहवाल हा थेट पुढे आलाय आणि अमेरिकेचे दावे खोटे असल्याचे स्पष्ट होतंय. भारताने जर रशियाकडून तेल खरेदी केले नसते तर एक मोठं संकट जगासमोर उभे राहिले असते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने जर रशियाकडून तेल खरेदी केले नसते तर जगासमोर एक मोठं जागतिक संकट उभे राहिले असते आणि तेच संकट भारताने रोखले आहे. जर भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे बंद केले असते तर आज कच्च्या तेलाची किंमत ही 200 डॉलर प्रती बॅरल झाली असती किंवा त्यापेक्षाही अधिक. ग्लोबल मार्केटमधून रशियाचे तेल बाहेर गेल्याने ब्रेंट क्रूड ऑईलने किंमतींमध्ये मोठी वाढ केली होती.

मार्च 2022 मध्ये 137 डॉलर प्रती बॅरलपर्यंत या किंमती गेल्या होत्या. त्यानंतरच भारताने रशियाकडून तेल खरेदी करून जागतिक संकट टाळले. मुळात म्हणजे भारताने नियमाप्रमाणेच रशियाच्या तेलाची खरेदी केली आहे आणि कोणताही नियम मोडला नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी एका मुलाखतीत म्हटले की, रशियाकडून तेल खरेदी करून भारत त्यांना मोठी मदत करत आहे. भारताचा पूर्ण व्यापार हा g7 आणि युरोपीय संघाच्या नियमाप्रमाणेच आहे. उलट भारताने तेलाची काळाबाजारी थांबवली आहे.

भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करून त्याच्यावर रिफायनरी करून जगभरात विकून नफेखोरी करत असल्याचा आरोप हा अमेरिकेकडून करण्यात आला. मात्र, भारताने जर हे केले नसते तर जगभरात मोठे संकट आले असते. भारतावर अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्याने निर्यात मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, याचे नुकसान कसे भरून काढायचे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.