AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Afganistan : अफगाणिस्तानबाबत पडद्यामागून भारताची मोठी चाल, पाकिस्तानचा होईल नुसता जळफळाट

Taliban Indian Relations : सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान तणावाने टोक गाठलेलं आहे. दोन्ही देशांच्या सीमांवर युद्धासारखी स्थिती आहे. या परिस्थितीत भारताने अशी एक चाल खेळली आहे की, पाकिस्तानचा नुसता जळफळाट होणार आहे.

India-Afganistan : अफगाणिस्तानबाबत पडद्यामागून भारताची मोठी चाल, पाकिस्तानचा होईल नुसता जळफळाट
Taliban Indian Relations
| Updated on: Jan 09, 2025 | 12:04 PM
Share

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर पहिल्यांदाच भारताच्या उच्च स्तरीय शिष्ट मंडळाने तालिबानसोबत बैठक केली. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दुबईमध्ये अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान यांची भेट घेतली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानुसार तालिबानने भारताच्या सुरक्षेबद्दल संवेदनशीलता व्यक्त केली आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तान तणावाने टोक गाठलेला असताना दुबईत ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे. दुसऱ्याबाजूला पाकिस्तानचे बांग्लादेशसोबत संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सध्याच्या स्थितीत भारत-तालिबानच एकत्र येणं, पाकिस्तानसाठी चिंतेचा विषय आहे.

“दोन्ही पक्षांनी अफगाणिस्तानला दिली जाणारी मानवी सहाय्यता, द्विपक्षीय मुद्दे आणि क्षेत्राच्या सुरक्षा स्थितीबद्दल चर्चा केली” असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायस्वाल यांनी सांगितलं. अफगाणी नागिरकांचा विकास आणि मानवी सहाय्यता प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याच भारताने म्हटलं. चाबहार बंदराच्या माध्यमातून व्यापार वाढवण्यावर एकमत झालं.

या बैठकीमुळे काय होईल?

भारत आणि अफगाणिस्तानचे पूर्वीपासून मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. भारताने मोठ्या प्रमाणात अफगाणिस्तानात गुंतवणूक केली आहे. तिथल्या संसदेसह अनेक इमारती भारताने बनवल्या आहेत. 2021 साली तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यानंतर भारताने तिथला आपला दूतावास बंद केला. जगातील अन्य देशांप्रमाणे भारताने सुद्धा अजून अफगाणिस्तानातील सरकारला मान्यता दिलेली नाही. दुबईतील भेटीनंतर भविष्यात हे दोन्ही देश अजून एकमेकांच्या जवळ येऊ शकतात.

क्रिकेटवर चर्चा

भारत आणि अफगाणिस्तानात क्रिकेट सारख्या खेळांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली. भारत दीर्घकाळापासून अफगाणिस्तान क्रिकेट टीमच होम ग्राऊंड आहे. त्याशिवाय नियमित संपर्क ठेवण्याचा आणि विभिन्न स्तरावर संवाद कायम ठेवण्यावर सहमती व्यक्त केली.

भारताने आतापर्यंत काय मदत केलीय?

भारताने मागच्या काही वर्षात अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात मानवी सहाय्यता केली आहे. यात 50 हजार मेट्रिक टन गहूं, 300 टन औषधं, 27 टन भूकंपापासून वाचवणारं साहित्य, 40 हजार लीटर कीटनाशक, 1 कोटी पोलियो डोस, 1.5 मिलियन कोविड-19 वॅक्सीन डोस, 11 हजार हायजीन किट्स आणि 1.2 टन स्टेशनरी किट्सचा समावेश आहे.

Follow Us
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ