AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या LPG पुरवठ्यावर मोठं संकट, इराण अमेरिका युद्धाची थेट झळ, फक्त इतक्या दिवसाचाच गॅस…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले असून पुढील काही दिवस युद्ध सुरू राहणार आहे. मात्र, या युद्धादरम्यान भारताच्या समस्यांमध्येही मोठी वाढ झाली. एलपीजी गॅसची समस्या भारतापुढे आले. याबाबत भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

भारताच्या LPG पुरवठ्यावर मोठं संकट, इराण अमेरिका युद्धाची थेट झळ, फक्त इतक्या दिवसाचाच गॅस...
LPG gas
| Updated on: Mar 04, 2026 | 9:26 AM
Share

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला. मात्र, या युद्धाचा फटका अनेक देशांना थेटपणे बसताना दिसत आहे. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज आहे. यासोबतच इराणने मोठा निर्णय घेत महत्वपूर्ण सागरी मार्ग बंद केल्याने टँकर येण्याची संख्या कमी आहे. स्टेट ऑफ होर्मुजवर तेल टँकर 80 टक्के कमी झाल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच जल मार्गावर हजारो टँकरचा मोठा जाम लागला आहे. स्टेट ऑफ होर्मुज मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला. यासोबतच येथे टँकर दिसले तर आम्ही आग लावू अशी धमकीही इराणकडून देण्यात आली, ज्यामुळे अनेक देश कोंडीत सापडली आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या, एलपीजी आणि एलएनजी गॅसच्या किंमतीत वाढ होत आहे. यासोबतच भारत देखील तणावात आहे.

कारण सध्याच्या स्थितीला भारतात होणारी ऊर्जेची आयात जवळपास बंद झाली. भारत सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, भारताकडे भरपूर सध्या स्टॉक आहे. पुढील 25 दिवस चालेल इतका साठा भारताकडे डिझेल आणि पेट्रोलचा आहे. भारताकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले की, भारत सध्या इतर पर्यायी गोष्टींसाठी प्रयत्न करत आहे. युद्ध जास्त काळ सुरू राहिले तर स्वयंपाक घरात लागणार एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

ज्याचा परिणाम थेट लोकांच्या घरापर्यंत होईल. तेल कंपन्यांनी यूनिटसोबत एलपीजी गॅसचे उत्पादन वाढवण्यास सुरूवात केली. सरकारकडून स्पष्ट करण्यात आले की, सध्याच्या परिस्थितीला कच्चे तेल, एलपीजी आणि एलएनजीची कोणतीही समस्या नाही. मात्र, असे असले तरीही देशात मोठ्या संख्येने दररोज ऊर्जा लागते, त्याची आयात अत्यंत महत्वाची आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्याच्या घडीला जरी डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती वाढत असल्या तरीही त्याचा कोणताही परिणाम सर्वसामान्य लोकांवर होणार नाही. डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या किंमती स्थिर राहतील. मुळात म्हणजे सध्याच्या घडीला भारताची चिंता डिझेल, पेट्रोल नाहीच, एलपीजी गॅस ही चिंता आहे. कारण भारतात 80 टक्के एलपीजी गॅस होर्मुजहून भारतात येते आणि तोच मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. यासोबतच भारताकडे एलपीजी गॅसचे कोणताही पर्याय नाही. आपल्या देशात 60 टक्के एलपीजी गॅस आयात केला जातो.

Follow Us
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार
परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार.