AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका कोरोना रुग्णाची लपवाछपवी देशाला भोवली, ऑस्ट्रेलियामध्ये 6 आठवड्यांचा लॉकडाऊन

ऑस्ट्रेलियात (Australia) एका नागरिकाने कोरोना संसर्ग झालेला असतानाही आरोग्य विभागाला खोटी माहिती दिली. याचा फटका संपूर्ण ऑस्ट्रेलियाला बसला आहे.

एका कोरोना रुग्णाची लपवाछपवी देशाला भोवली, ऑस्ट्रेलियामध्ये 6 आठवड्यांचा लॉकडाऊन
| Updated on: Nov 21, 2020 | 10:18 PM
Share

कॅनबेरा : कोरोना विषाणूचा (Coroanvirus) संसर्ग झाला असेल किंवा त्याची काही लक्षणं दिसत असतील तर अनेक लोक ही माहिती लपवतात. मात्र, कोरोनाशी संबंधित माहितीची लपवाछपवी केवळ त्या व्यक्तीसाठीच नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या समाजालाही महागात पडू शकते याचं एक मोठ उदाहरण समोर आलंय. ऑस्ट्रेलियात (Australia) एका नागरिकाने कोरोना संसर्ग झालेला असतानाही आरोग्य विभागाला खोटी माहिती दिली. याचा फटका संपूर्ण ऑस्ट्रेलियाला बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने संसर्गाचा धोका लक्षात घेत संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केला आहे (Australia imposed lockdown after a Corona positive person hides his identity).

ही घटना दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये घडली. या ठिकाणी एका व्यक्तीच्या बेजबाबदार वर्तनामुळे प्रशासनाच्या अडचणीत चांगलीच वाढ झालीय. संबंधित कोरोना बाधित व्यक्तीने त्याला संसर्ग झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आरोग्य विभागाला खोटी माहिती दिली. हा व्यक्ती एका पिज्जा शॉपमध्ये काम करत होता. मात्र, संसर्ग झाल्यानंतर त्याने आपण काम करत असलेलं दुकान बंद होऊ नये म्हणून आपण केवळ पिज्जा आणण्यासाठी गेलो होतो सांगितलं.

यामुळे पिज्जा घ्यायला गेला असताना त्याला संसर्ग झाला असावा असं आरोग्य कर्मचाऱ्यांना वाटलं. मात्र, त्या ठिकाणी जवळपास 36 जण कोरोना बाधित निघाल्यानंतर अखेर ऑस्ट्रेलिया प्रशासनाने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला.

ऑस्ट्रेलियाचे स्टेस प्रीमिअर स्टीवर मार्शल यांनी या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, सातत्याने कोरोना संसर्गाच्या घडामोडींवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया त्या निवडक देशांपैकी एक होता जिथं कोरोना संसर्ग खूप चांगल्या प्रकारे नियंत्रित होता. मात्र, या घटनेनंतर येथील स्थिती बदलली आहे.

पोलिसांनी अद्याप खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीविरोधात कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. दक्षिण ऑस्ट्रेलियाचे पोलीस आयुक्त ग्रांट स्टीवन यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरी माहिती समोर आल्यानंतर आता तपासाची प्रकिया बदलली आहे. जर या व्यक्तीने खरी माहिती दिली असती, तर देशात 6 आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याची गरज पडली नसती.

असं असलं तरी तेथील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी केवळ 3 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे निश्चित वेळेच्या आधीच लॉकडाऊन उठवला जाऊ शकतो, असाही अंदाज वर्तवला जात आहे.

संबंधित बातम्या :

आता घर बसल्या स्वतःच कोरोना चाचणी करा, USFDA ची ‘सेल्फ टेस्ट किट’ला मंजुरी

मोठी बातमी : शेवटच्या चाचणीत फायझरची लस 95 टक्के परिणामकारक, लवकरच बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता

वुहानचं सत्य जगासमोर आणल्यानं चीन चवताळला; महिला पत्रकाराला कठोर शिक्षा सुनावली

व्हिडीओ पाहा :

Australia imposed lockdown after a Corona positive person hides his identity

Follow Us
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.