AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Bangladesh : भारताला डिवचणारं, पटणार नाही बांग्लादेशातील नवीन सरकार करणार तेच काम

India-Bangladesh : 1971 च्या मुक्ती संग्रामानंतर पाकिस्तानच्या पश्चिमी भागापासून वेगळा होऊन बांग्लादेश स्वतंत्र देश बनला. शेख हसीना यांचे पिता शेख मुजीबुर्रहमान या स्वातंत्र्य संग्रामाचे नायक होते. पाकिस्तानी सैन्यावर या क्षेत्रात अत्याचार केल्याचे आरोप आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या संघर्षात जवळपास 30 लाख लोकांचा मृत्यू झाला.

India-Bangladesh : भारताला डिवचणारं, पटणार नाही बांग्लादेशातील नवीन सरकार करणार तेच काम
PM Modi-muhammad yunus
| Updated on: Sep 06, 2024 | 10:46 AM
Share

बांग्लादेशच्या नव्या सरकारसोबत अजून भारताचे सूर जुळलेले नाहीत. भारत सरकारने शेख हसीना यांना आश्रय दिला आहे. ही गोष्ट बांग्लादेशच्या नव्या सरकारच्या पचनी पडत नाहीय. शेख हसीना यांचे कट्टर विरोधक बांग्लादेशात बनलेल्या नव्या अंतरिम सरकारमध्ये आहेत. भारत शेख हसीना यांच्या पाठिशी उभा राहिल्याने अंतरिम सरकार भारताच्या विरोधात दिसत आहे. मोहम्मद यूनुस यांच्या नेतृत्वाखाली हे अंतरिम सरकार भारताच्या चिंता वाढवणारे निर्णय घेत आहे. मोहम्मद यूनुस यांच्या अंतरिम सरकारने आधी हसीना यांच्या कार्यकाळात झालेल्या MoU ची समीक्षा करणार असल्याच म्हटलं. आता बांग्लादेशची पाकिस्तान सोबत जवळीक वाढत चालली आहे.

बांग्लादेशच्या अंतरिम सरकारमधील ब्रॉडकास्टिंग आणि IT मंत्री नाहिद इस्लाम यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. पाकिस्तानसोबत 1971 च्या मुक्ती संग्रामाचे जे मुद्दे आहेत, त्यावर आम्हाला तोडगा काढायचा आहे, असं नाहिद इस्लाम ढाका येथे पाकिस्तानी राजदूतासोबतच्या बैठकीनंतर बोलले. त्याआधी 30 ऑगस्टला पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मोहम्मद यूनुस यांना फोन केला होता. दोन्ही देशांतील लोकांची प्रगती आणि समृद्धीसाठी एकत्र मिळून काम करण्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चेत भर दिला होता.

बांग्लादेशच नवीन सरकार काय करतय?

महिन्याभरापूर्वी बांग्लादेशसाठी भारत जवळचा मित्र होता. भारतासोबत घनिष्ठ संबंध होते. पण सत्तापालट होताच बांग्लादेश चीन आणि पाकिस्तानच्या जवळ चालला आहे. हसीना सरकारच्या काळात पाकिस्तान आणि बांग्लादेशचे संबंध फार चांगले नव्हते. शेख हसीना सरकारने जमात-ए-इस्लामीच्या अनेक नेत्यांवर 1971 युद्धावरुन वॉर क्राइमचे (युद्ध गुन्हा) आरोप केले होते.

नाहिद इस्लाम कोण?

नाहिद इस्लाम हे विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेलं नेतृत्व आहे. शेख हसीना सरकारविरोधात जे विद्यार्थी आंदोलनाच चेहरा राहिले, त्यात नाहिद इस्लाम आहे. तो आता अंतरिम सरकारमध्ये मंत्री आहे. अंतरिम सरकारमधील वरिष्ठ अधिकारी आणि बांग्लादेशातील पाकिस्तानी उच्चायुक्त सैयद अहमद मारूफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर नाहिद इस्लामने हे वक्तव्य केलं आहे.

Follow Us
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून 30 लाखांचा गंडा.
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप
गॅस सिलेंडरसाठी मुंबईकर रांगेत; कांदिवलीत बंदोबस्तात सिलेंडरचे वाटप.