AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने भर समुद्रात टाकला डाव! पाकिस्तानकडे जाणारं जहाज इराणने अडवलं, त्यानंतर घडलं असं की…

Strait of Hormuz : इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धादरम्यान भर समुद्रात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला जबर हादरा बसला आहे, तर भारताला लॉटरी लागली आहे.

भारताने भर समुद्रात टाकला डाव! पाकिस्तानकडे जाणारं जहाज इराणने अडवलं, त्यानंतर घडलं असं की...
ShipImage Credit source: Google
| Updated on: Apr 06, 2026 | 9:36 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यातील यु्द्धामुळे आखाती देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले आहे, त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या जहाजांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. या युद्धामुळे संपूर्ण जगाच्या तेल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशातच आता भर समुद्रात एक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे पाकिस्तानला जबर हादरा बसला आहे, तर भारताला लॉटरी लागली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत नेमकं असं काय घडलं ज्यामुळे भारताला मोठा फायदा झाला? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पाकिस्तानकडे जाणारं जहाज…

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांना इराणची परवानगी घेणे गरजेचे आहे. अशातच आता पाकिस्तानचे सेलेन नावाचे जहाज अन्नसामग्री घेऊन कराची बंदराकडे निघाले होते. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीत पोहोचताच इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने ते थांबवले. या जहाजाला पुढे जाण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतर आता अशी माहिती समोर आली आहे की, पाकिस्तानकडे जाण्याऐवजी हे जहाज भारतातील मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले आहे. आता हे जहाज पुढील दोन दिवसांत ते मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. या एका घटनेमुळे पाकिस्तान-इराण संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

जहाज 9 एप्रिलला मुंबईत येणार

समोर आलेल्या माहितीनुसार, सेंट किट्स अँड नेविस देशाचे हे जहाज 23 मार्च रोजी यूएईमधील शारजाह येथून पाकिस्तानातील कराचीकडे निघाले होते. हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीत पोहोचताच प्रवेश करताच इराणच्या IRGC नौदलाने त्याला वेढा घातला. या जहाजाला पुढे जाण्यासाठी परवानगी नाही असं सांगण्यात आलं. आता इराणच्या या कडक भूमिकेनंतर जहाजाने आपला मार्ग बदलला आहे. VesselFinder आणि MarineTraffic च्या माहितीनुसार हे जहाज आता सुमारे 10–11 नॉट्स वेगाने मुंबईकडे येत आहे. ते 9 एप्रिलपर्यंत भारताच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे भारताचा फायदा झाला असून पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, इराणने न्यूयॉर्कमधील आपल्या मिशनमार्फत स्पष्ट केले आहे की, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याच्यासाठी प्रत्येक जहाजाने इराणी अधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे. असे न केल्यास जहाज अडवण्यात येते. याआधी काही जहाजांवर हल्ला देखील झाला होता. मात्र भारतीय जहाजांना या मार्गाने प्रवास करण्यास इराणने अनेकदा परवानगी दिली आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल