AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला मोठा झटका, परदेशातील एकमेव लष्करी विमानतळ बंद; महत्त्वाचे ठिकाण हातातून निसटले, कुणाचा दबाव?

India Airbase : दिल्लीपासून 900 किलमोटीर दूर असलेला अत्यंत महत्त्वाचा एअरबेस, विमानतळ बंद करावा लागला आहे. येथे भारतीय लष्कर गेल्या 20 वर्षांपासून तैनात होते. या ठिकाणाहून पाकिस्तान, चीन आणि रशियावर भारताला लक्ष्य ठेवता येत होते. सामरिक दृष्ट्या हे स्थळ महत्त्वाचे होते.

भारताला मोठा झटका, परदेशातील एकमेव लष्करी विमानतळ बंद; महत्त्वाचे ठिकाण हातातून निसटले, कुणाचा दबाव?
लष्करी विमानतळ बंद
| Updated on: Nov 02, 2025 | 8:57 AM
Share

Tajikistan India Airbase : दिल्लीपासून 900 किलोमीटर अंतरावरील लष्करी विमानतळ बंद करावे लागले आहे. सामरिकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण होते. येथून पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन आणि रशियावरही भारताला लक्ष्य ठेवता येत होते. गेल्या 20 वर्षांपासूनचा हा ‘की’पॉईंट भारताच्या हातून निसटला. त्यासाठी कुणाचा दबावा होता, हे महत्त्वाचे ठिकाण हातून गेल्याने भारताचे काय नुकसान होणार?

तजाकिस्तानमध्ये होता एअरबेस

तजाकिस्तानमध्ये भारताचा परदेशातील एकमेव लष्करी विमानतळ होता. हा विमानतळ भारताला सोडावा लागला. परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्तावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यावरून आता काँग्रेसने मोदी सरकारला घेरले आहे. सामरिकदृष्ट्या आणि आंतरराष्ट्रीय कुटनीतीच्या दृष्टीने हे स्थळ अत्यंत महत्ताचे होते. तजाकिस्तानची राजधानी दुशांबेजवळ 10 किलोमीटरवर हे स्थळ होते. या लष्करी विमानतळापासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान अगदी जवळ होते. तर दुसरीकडे चीन आणि रशियापण जवळ आहे. गेल्या 20 वर्षांपासून भाडेतत्त्वावर हे विमानतळ भारताकडे होते. पण हा करार तजाकिस्तानने पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. त्यामागे कुणाचा हात आहे याची चर्चा सुरू झाली आहे.

अयनी एअरबेस अत्यंत महत्त्वाचा

काँग्रेस प्रवक्ता जयराम रमेश यांनी सरकारर निशाणा साधला आहे. अयनी लष्करी विमानतळाजवळ अनेक सांस्कृतिक ठेवा आहे. येथे भगवान गौतम बुद्धांची निर्वाण अवस्थेतील भव्य मूर्ती आहे. ती 1500 वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येते. येथून जवळच आकर्षक आणि अद्भूत संग्रहालय आहे. त्यासाठी भारताने मदत केली होती. 2002 पासून हा महत्त्वाचा लष्करी तळ भारताने विकसीत केला. तिथे सातत्याने मदत पोहचवली. या लष्करी तळामुळे मध्य आशियात भारताचा दबदबा निर्माण झाला होता. पाकिस्तान आणि चीन तसेच तुर्कीवर भारताचा दबाव तयार झाला होता. पण आता तजाकिस्तानने हात आखडता घेतला. 20 वर्षांनी भारताला हा महत्त्वाचा लष्करी तळ सोडावा लागला. अयनी एअरबेसमुळे तालिबान आणि पाकिस्तानला घाम फुटला होता. या ठिकाणी भारतीय लष्कर, लष्करी विमानं तैनात होती.

तजाकिस्तानवर कुणाचा दबाव?

माध्यमातील वृत्तानुसार, भारताने हा लष्करी विमानतळ भाडेतत्त्वावर घेतला होता. तेव्हापासून तो भारतीय वायुदलाकडे होता. येथे भारतीय वायु दलाची हेलिकॉप्टर्सची एक तुकडी, एक कंपनी सेंटर, लष्कराचे युनिट, विमान होते. तजाकिस्तानमधील हे एअरबेस भारतासाठी लष्करी हालचालीसहएक लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून कार्यरत होते. भाडेकरार संपल्यावर तजाकिस्तानने हा करार पुढे चालू ठेवण्यास नकार दिला. भारताचा मध्य आशियातील दबदबा यामुळे कमी होण्याची शक्यता आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ