AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लाखो भारतीयांना फायदा! चीनने घेतला सर्वात मोठा निर्णय; अमेरिकेला धक्का

भारत आणि चीन यांच्यातील संबंधात आता सुधारणा होत आहे. असे असतानाच आता चीनने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाखो भारतीयांना फायदा होणार आहे.

लाखो भारतीयांना फायदा! चीनने घेतला सर्वात मोठा निर्णय; अमेरिकेला धक्का
china and india relationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 08, 2025 | 10:14 PM
Share

China Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘अमेरिका फस्ट’ या धोरणामुळे जागतिक राजकारण चांगलेच बदलले आहे. ट्रम्प यांनी भारतासह काही देशांवर लादलेल्या टॅरिफमुळेही अनेक देश सावध झाले आहेत. भारत, चीन, रशिया यासारखे देश व्यापारवाढीसाठी नवे मित्र शोधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चीन, रशिया यासारख्या देशांकडून अनेक नियमांत शिथिलतआणली जात आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळेच भारत आणि चीन एकमेकांच्या जवळ आले आहेत. दोन्ही देशांत व्यापारवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. असे असतानाच आथा भारत आणि चीन यांच्यातील संबंध आणखी वृद्धींगत व्हावेत म्हणून चीनने एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो भारतीयांना मोठा लाभ होणार आहे.

नेमका काय निर्णय घेण्यात आला?

सध्या भारत आणि चीन यांच्यातील संबंध बदलत आहेत. दोन्ही देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. असे असतानाच चीनने आपल्या व्हिसाच्या धोरणात मोठा बदल केला आहे. आता भारतीयांना चीनला जाण्यासाठी व्हिसा हवा असेल तर कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही. चीनने भारतीयांना व्हिसा मिळावा यासाठी ऑनालाईन अर्ज प्रक्रिया चालू केली आहे. भारतासोबतचे संबंध बिघडल्यानंतर चीनने ही सुविधा थांबवली होती. आता पुन्हा एकदा ती सुरू करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करता येईल

या निर्णयाबाबत चीनचे भारतातील राजदूत शू फहॉन्ग यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडियावर अधिकृत घोषणा केली आहे. त्यांनी केलेल्या घोषणेनुसार 22 डिसेंबर 2025 पासून भारतीयांना चीनला जाण्यासाठी व्हिसा हवा असेल तर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्यामुळे भारतीयांना आता चीनी दूतावास किंवा व्हिसा सेंटरला जाण्याची गरज पडणार नाही. घरी बसल्या-बसल्या चीनचा व्हिसा मिळणार आहे. चीनला शह देता यावा म्हणून अमेरिकेने भारतासोबत संबंध वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता भारत आणि चीन जवळ आले आहेत. असे असताना आता चीनने व्हिसासंदर्भात हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमेरिकेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

भारताने निर्णय घेतल्यानंतर चीनचाही निर्णय

दरम्यान, चीनसोबतच्या संबंधात सुधारणा झाल्यानंतर भारतानेही चीनी नागरिकांना याआधीच व्हिसा देण्यास सुरुवात केलेली आहे. 2020 साली भारत-चीन सीमेवर तणाव झाल्यानंतर भारताने चीनी नागरिकांसाठी व्हिसा देण्याची सुविधा बंद केली होती. त्यानंतर आता चीननेही भारतीयांना व्हिसा मिळावा यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. चीनच्या या निर्णयाचा लाखो भारतीयांना फायदा होणार आहे.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.