AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Imran Khan: इम्रान खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट, मुलाचा कुणावर आरोप? थेट नाव घेत…

Imran Khan Pakistan: माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविषयी एक मोठा दावा करण्यात येत आहे. खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. त्यांच्या या आरोपाने सुटकेच्या प्रयत्नांना धक्का लागल्याचे मानले जात आहे.

Imran Khan: इम्रान खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट, मुलाचा कुणावर आरोप? थेट नाव घेत...
इम्रान खान
| Updated on: Aug 28, 2026 | 12:27 PM
Share

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेट कर्णधार इम्रान खान यांना तुरुंगातच ठार मारण्याचा कट आखल्याचा आरोप त्यांच्या मुलांनीच केला आहे. कासिम आणि सुलेमान खान या त्यांच्या मुलांनी पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप केला आहे. तुरूंगातच त्यांच्यावर विष प्रयोग अथवा हत्येचा कट रचल्या जात असल्याचा आरोप मुलांनी केला आहे. द टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान यांच्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या तुरुंगातील सुरक्षेवरून मोठी चिंता व्यक्त केली आहे. शहबाज शरिफ सरकार त्यांच्या वडिलांना ठार मारण्याचा कट रचत असल्याचा आरोप मुलांनी केला आहे. सरकारच्या या धोरणामुळे वडिलांच्या जीवाला मोठा धोका असल्याचा दावा त्यांनी केला.

जेमिमा गोल्डस्मिथची कासिम आणि सुलेमान ही मुलं

73 वर्षीय इमरान खान हे गेल्या 3 वर्षांपासून तुरुंगात आहेत. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना पंतप्रधान पदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्यावर कायदेशीर खटले सुरू आहेत. या खटल्यांमध्ये ते सध्या तुरुंगात आहेत. इम्रान खान यांचे कासिम आणि सुलेमान हे मूलं आहेत. यापूर्वीची पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ यांच्यापासून त्यांना दोन मूलं झाली आहेत. दोन्ही मुलांनी गेल्या काही वर्षांपासून तुरुंगात असलेल्या वडिलांविषयी मोठी चिंता व्यक्त केली आहे. तर यापूर्वी त्यांच्या बहि‍णींनी इम्रान खान हे जिवंत आहेत की नाही? यावरच प्रश्न उपस्थित केला होता. आपल्याला सलग तीनदा त्यांना भेटण्यास मज्जाव करण्यात आल्याचा आरोप इम्रान यांच्या बहि‍णींनी केला होता.

ताज्या आरोपात इम्रान यांच्या मुलांनी तुरूंगातील परिस्थितीवर आंतरराष्ट्रीय मंचावर आवाज उठवला आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, इम्रान खान हे चर्चित चेहऱ्यांपैकी एक आहेत. पण त्यांना तुरुंगात अमानवीय वागणूक देण्यात येत आहे. त्यांना राजकीय कैद्यांशी संबंधित कोणत्याही सोयी-सुविधा दिल्या जात नाहीत. त्यांना नातेवाईकांना सु्द्धा भेटू दिलं जात नाही. यापूर्वी त्यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून मोठा हंगामा केला होता. 1992 मध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वात पाकिस्तानने क्रिकेट विश्वकप जिंकला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी पाकिस्तानच्या राजकारणात उडी घेतली. आघाडी सरकारच्या काळात ते पंतप्रधान झाले.

राजकीय द्वेषातून कारवाई

पाकिस्तान तहरीक -ए-इन्साफ, PTI हा पक्ष त्यांनी स्थापन केला होता. या पक्षाने पाकिस्तानच्या राजकारणाला एक वेगळं वळण दिले होते. या काळात भारताशी फारसे संबंध सुधारले नसले तरी अंतर्गत तरुणाईला राजकारणात मोठे स्थान मिळाले होते. आताचे शरीफ सरकार इम्रान खान यांच्याविरोधात सुडबुद्धीने वागत असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. भारतीय क्रिकेटर्ससह जागतिक खेळाडूंनी इम्रान खान यांच्या सुटकेसाठी दबाव वाढवला आहे.

Follow Us
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video पहा
अंबादास दानवेंच्या निवासस्थानी रक्षाबंधन सण उत्साहात साजरा, Video आला समोर
कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
Manoj Jarange On Hunger Strike | 'कुणीही घरी बसू नका; अंतरवाली सराटीत या' मनोज जरांगेचं मोठं आवाहन
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य,
हिरव्या निसर्गाच्या सान्निध्यात मुंबई-गोवा हायवेचं विलोभनीय सौंदर्य, पाहा मनमोहक दृश्य
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर; 12 तासांतच
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात खासदार श्रीकांत शिंदे ॲक्टिव्ह मोडवर;12 तासांतच...
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
एमपीएससी पेपरफुटी: ऋतुजा पाटीलची प्रश्नपत्रिकेसाठी ५ लाखांची मागणी
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
मुंबईत दुधाच्या दरात 1 सप्टेंबरपासून 9 रुपयांची वाढ
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी शिंदेंचा संवाद
नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील महिला पर्यटकांशी उपमुख्यमंत्री शिंदेंचा व्हिडीओ कॉल
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी