AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

150 ते 200 टक्के टॅरिफ लादण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची भारतासह या देशाला धमकी, थेट मोठा दावा, म्हणाले, मी…

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह चीनवर मोठा टॅरिफ लावून टॅरिफ काय काय चांगले घडले हे सांगत फिरताना दिसत आहेत. आता त्यांनी अत्यंत मोठा दावा पुन्हा एकदा केल्याचे बघायला मिळतंय.

150 ते 200 टक्के टॅरिफ लादण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची भारतासह या देशाला धमकी, थेट मोठा दावा, म्हणाले, मी...
Donald Trump tariff on India
| Updated on: Oct 14, 2025 | 12:14 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा शांतता शिखर परिषदेमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांवर मोठे भाष्य केले. हेच नाही तर यावेळी उपस्थित पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील त्यांनी मोठा प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध रोखल्याचा दावा करताना मागील काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प दिसत आहेत. आता थेट भर मंचावर त्यांनी भारत-पाकिस्तान संबंधांवर भाष्य करत भविष्यात हे दोन्ही देश खूप चांगले राहतील, असे म्हटले. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील तणावाच्या परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. मी काही युद्धे फक्त टॅरिफच्या आधारे सोडवली, असे त्यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, उदाहरणार्थ भारत आणि पाकिस्तान युद्ध. मी त्यांना म्हणालो की, जर तुम्हाला युद्ध करायचे असेल आणि तुमच्याकडे अण्वस्त्रे आहे तर मग मी तुमच्या दोघांवरही 100 टक्के 150 टक्के किंवा 200 टक्के असा मोठा टॅरिफ (कर) लावणार आहे. मी त्यांना स्पष्ट म्हणालो की, मी टॅरिफ लावत आहे. 24 तासाच्या आत तुमचे हे युद्ध बंद झालेले असले पाहिजे. मला मनातून वाटते की, टॅरिफ नसता तर हे युद्ध थांबले नसते. शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्याच्या काही तास अगोदर त्यांनी हे भाष्य केले.

22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात फक्त हिंदू पर्यटकांना टार्गेट करत त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट बघायला मिळाली. या हल्ल्यातील सर्व दहशतवादी हे पाकिस्तानातून आल्याचे स्पष्ट झाले. हेच नाही तर त्यांनी हल्ल्याच्या ठिकाणाची रेकी देखील केली. पहलगाम हल्ल्याचे काही फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसली.

पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबण्यात आले. पाकिस्तानात घुसून भारताने दहशतवाद्यांची अड्डे नष्ट केली. यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले आणि दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होते. यादरम्यान आपण या युद्धात मध्यस्थी केल्याचा दावा वारंवार डोनाल्ड ट्रम्प दिसले. भारताने स्पष्ट केले की, या युद्धात कोणीही हस्तक्षेप न करता व्दिपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांनी युद्ध थांबवले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत