AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलापासून साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं; आता थेट खिसा रिकामा!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची झळ भारताला बसायला सुरुवात झाली आहे. एफएमसीजी कंपन्या आता आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. तशी चर्चा चालू झाली आहे.

तेलापासून साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं; आता थेट खिसा रिकामा!
FMCG PRODUCTS PRICE INCREASEImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2026 | 4:24 PM
Share

FMCG Product Price May Increase : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ्या पातळीवर फटका बसत आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जलवाहतूक ठप्प पडली असून भारतात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी कच्चा माल कमी पडत आहे. याच सर्व गोष्टींचा फटका बसायला आता सुरुवात झाली आहे. भारताला महागाईचे चटके बसायला लागले आहेत. असे असतानाच आता फास्ट मुव्हिंग कन्झ्यूमर गुड्स अर्थात एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. असे झाले तर तुमच्या रोजच्या वापरताली साबण, तेल तसेच इतर अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.

किमती 3 ते 4 टक्क्यांनी वाढणार?

मिळालेल्या माहितीनुसार एफएमसीजी कंपन्या वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या ब्रोकरेज फर्मने आपल्या एका रिपोर्टमध्ये तसा दावा केला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ तसेच जागतिक पातळीवर घसरलेला रुपया या दोन गोष्टींमुळे उत्पादनास लागणाऱ्या कच्च्या मालाचा आयात खर्च वाढला आहे. त्यामुळे अशा स्थितीत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत स्थिर ठेवणं कठीण होत आहे. त्यामुळेच कच्चा माल महागल्यामुळे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पहिल्या तिमाहीत किमती 3 ते 4 टक्क्यांनी वाढू शकतात.

शाम्पू, तेल, बिस्कीट महागण्याची शक्यता

वित्त वर्ष 2025-26 मध्ये एफएमसीजी कंपन्यांकडे असलेल्या कच्च्या मालाच्या साठ्यामुळे उत्पादन घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु आता कच्चा माल कमी पडू लागल्याने तसेच कच्च्या मालाची किंमत वाढल्याने हा भाववाढीचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय प्रत्यक्षात घेण्यात आला तर FMCG कंपन्यांकडून तयार केले जाणारे शाम्पू, तेल, बिस्कीट आदी उत्पादनांची किंमत वाढू शकते. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Follow Us
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप
शिंदेंच्या काळात नगरविकास खात्यात मोठा भ्रष्टाचार, राऊतांचे थेट आरोप.
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची...
मुंबई, पुण्यावरही 'अवकाळी'ची अवकृपा, पुढील 24 तास धोक्याची....
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?
राऊतांचा मोठा दावा शिंदे-अजित पवार गटातील 25-30 आमदार भाजपच्या वाटेवर?.