AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलापासून साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं; आता थेट खिसा रिकामा!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाची झळ भारताला बसायला सुरुवात झाली आहे. एफएमसीजी कंपन्या आता आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. तशी चर्चा चालू झाली आहे.

तेलापासून साबणापर्यंत, सगळं काही महाग, सामान्यांचं टेन्शन वाढलं; आता थेट खिसा रिकामा!
FMCG PRODUCTS PRICE INCREASEImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2026 | 4:24 PM
Share

FMCG Product Price May Increase : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण देशाला वेगवेगळ्या पातळीवर फटका बसत आहे. भारतासह अनेक देशांत उर्जासंकट निर्माण झाले आहे. कच्चे तेल, नैसर्गिक वायूच्या कमतरतेमुळे इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने जलवाहतूक ठप्प पडली असून भारतात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंसाठी कच्चा माल कमी पडत आहे. याच सर्व गोष्टींचा फटका बसायला आता सुरुवात झाली आहे. भारताला महागाईचे चटके बसायला लागले आहेत. असे असतानाच आता फास्ट मुव्हिंग कन्झ्यूमर गुड्स अर्थात एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्या आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याची शक्यता आहे. असे झाले तर तुमच्या रोजच्या वापरताली साबण, तेल तसेच इतर अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे.

किमती 3 ते 4 टक्क्यांनी वाढणार?

मिळालेल्या माहितीनुसार एफएमसीजी कंपन्या वित्त वर्ष 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याच्या विचारात आहेत. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या ब्रोकरेज फर्मने आपल्या एका रिपोर्टमध्ये तसा दावा केला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ तसेच जागतिक पातळीवर घसरलेला रुपया या दोन गोष्टींमुळे उत्पादनास लागणाऱ्या कच्च्या मालाचा आयात खर्च वाढला आहे. त्यामुळे अशा स्थितीत कंपन्यांना आपल्या उत्पादनाची किंमत स्थिर ठेवणं कठीण होत आहे. त्यामुळेच कच्चा माल महागल्यामुळे आर्थिक वर्ष 2026-27 मध्ये पहिल्या तिमाहीत किमती 3 ते 4 टक्क्यांनी वाढू शकतात.

शाम्पू, तेल, बिस्कीट महागण्याची शक्यता

वित्त वर्ष 2025-26 मध्ये एफएमसीजी कंपन्यांकडे असलेल्या कच्च्या मालाच्या साठ्यामुळे उत्पादन घेण्यात कोणतीही अडचण येणार नाही. परंतु आता कच्चा माल कमी पडू लागल्याने तसेच कच्च्या मालाची किंमत वाढल्याने हा भाववाढीचा निर्णय होऊ शकतो. हा निर्णय प्रत्यक्षात घेण्यात आला तर FMCG कंपन्यांकडून तयार केले जाणारे शाम्पू, तेल, बिस्कीट आदी उत्पादनांची किंमत वाढू शकते. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा