AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑपरेशन सिंदूरच्या जखमा भरण्यासाठी पाकिस्तान चीनच्या दारात, हवाई ताकद वाढवण्यासाठी मागितले हे विमान

‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये तोंडावर आपटल्याने पाकिस्तानने आता आपले हवाई दल आणखीन मजबूत करण्याची तयारी सुरु केली आहे. पाकिस्तान आता चीनकडून KJ-500 AWACS सारखे विमान खरेदी करण्याची तयारी करीत आहे. काय आहे या विमानाचे वैशिष्ट्ये ?

ऑपरेशन सिंदूरच्या जखमा भरण्यासाठी पाकिस्तान चीनच्या दारात, हवाई ताकद वाढवण्यासाठी मागितले हे विमान
KJ-500 AWACS
| Updated on: Apr 11, 2026 | 7:08 PM
Share

भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ ने दिलेल्या जखमा पाकिस्तान अजूनही विसरलेल्या नाही. या युद्धाला एक वर्षे झाले तरी पाकिस्तान अजूनही शांत बसलेला नाही. आता पाकिस्तान या जखमांवर फुंकर मारण्यासाठी चीनकडे आशाळभूतपणे पाहात आहे. पाकिस्तान आता त्यांच्या हवाई दलाला मजबूत करण्याच्या मागे लागला आहे. पाकिस्तान चीनकडून KJ-500 AWACS (  एअरबोर्न वार्निंग एण्ड कंट्रोल सिस्टम ) हे रडार यंत्रणा असलेले विमान खरेदी करण्याच्या विचारात आहे.

वास्तविक ऑपरेशन सिंदुरमध्ये भारतीय वायू सेनेने पाकिस्तानचे एक महत्वाचे Saab 2000 Erieye AWACS विमान टार्गेट केले होते. या घटनेने पाकिस्तानची हवाई टेहळणी आणि कमांड सिस्टीमची कमजोरीला उघडे पाडले होते.

चीनचे विमान का आहे खास?

आता पाकिस्तान या कमतरतेला पूर्ण करण्यासाठी चीनच्या अत्याधुनिक KJ-500 विमान त्यांच्या वायू सेनेत समाविष्ठ करु इच्छीत आहे. KJ-500 हे एक आधुनिक AWACS (Airborne Warning and Control System) विमान आहे. त्यास ‘फ्लाईंग रडार’ म्हणून ओळखले जाते. हे विमान ३६० डिग्रीत टेहळणी करण्यास सक्षम आहे आणि शत्रूची फायटर जेट, मिसाईल आणि ड्रोनला खूप दूर अंतरावरुन अचूक ओळखते.KJ-500 ची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचे अत्याधुनिक रडार यंत्रणा आणि नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर क्षमता आहे. हे विमान केवळ टेहळणीच नाही तर लढाऊ विमानांना आणि मिसाईल सिस्टीम एकत्र जोडून चांगल्या वॉर मॅनेजमेंटमध्ये मदत करते. यामुळे पाकिस्तानी वायू सेनेला भविष्यात वेगवान आणि अचूक निर्णय घेण्यास मदत मिळू शकते.

काय होणार परिणाम ?

पाकिस्तानी माध्यमातील वृत्तानुसार AWACS विमानासंदर्भात चीन आणि पाकिस्तानच्या अधिकाऱ्यात दरम्यान औपचारिक चर्चा जून २०२५ मध्ये सुरु झाली होती. तसेच सध्याच्या काळात पाकिस्तानजवळ स्वीडनची Saab 2000 Erieye सारखे विमान आहे. ज्यांची क्षमता मर्यादित मानली जाते. या विमानात ३६० डिग्री कव्हरेज नसते आणि काही भागात ‘ब्लाईंड स्पॉट’ देखील रहातो. संरक्षण तज्ज्ञांच्या मते जर पाकिस्तानने KJ-500 या विमानाला त्यांच्या ताफ्यात समाविष्ठ केले तर यामुळे भारत-पाकिस्तानातील हवाई संतुलनावर परिणाम होऊ शकतो. मात्र, भारतीय वायूसेना आधीच आधीच आधुनिक सिस्टीम आणि मजबूत एअर डिफेन्स नेटवर्कने सुसज्ज आहे. ज्यामुळे ऑपरेशन सिंदुरमध्ये भारताने आपली शक्ती सिद्ध केली आहे.

Follow Us
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ
वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला धार्मिक अधिकार दिला - हर्षवर्धन सपकाळ.
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?
ब्लॅक मॅजिक करणारे ते नेते कोण? रोहित पवाराचा रोख नेमका कुणाकडे?.
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण
'सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार' मुख्यमंत्री म्हण.
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स.
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय
'वारकरी संप्रदायात 60 % लोकांच्या...' शरद पवारांच्या भाष्यावरुन राजकीय.
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ
सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका? बीडमधील पत्रामुळे खळबळ.
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक
ऑपरेशन टायगर चर्चेनंतर, सावंत-ठाकरे यांची मातोश्रीवर महत्त्वपूर्ण बैठक.
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.